ETV Bharat / state

Ganeshotsav 2022 गणरायाला आधुनिक भारताचा देखावा, पुण्यातील तांबोळी कुटुंबीयाचा सामाजिक संदेश

author img

By

Published : Sep 4, 2022, 4:31 PM IST

ganpati decoration
आधुनिक भारताचा देखावा

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. त्यानिमित्त यंदाच्या वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा केला जात आहे. त्यामुळे देशात अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत. त्यात पुण्यातला गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध Ganeshotsav 2022 आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे देखावे ही साकारले जातात त्याचबरोबर घरच्या गणपतीसाठी देखील अनेक नागरिक हे देखावे करत Ganesh festival 2022 असतात. असेच पुण्यातले तांबोळी कुटुंबीय गेल्या 25 वर्षांपासून वेगवेगळे देखावे सादर करत आहेत.

पुणे - भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. त्यानिमित्त यंदाच्या वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा केला जात आहे. त्यामुळे देशात अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत. त्यात पुण्यातला गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध Ganeshotsav 2022 आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे देखावे ही साकारले जातात त्याचबरोबर घरच्या गणपतीसाठी Ganesh festival 2022 देखील अनेक नागरिक हे देखावे करत असतात. असेच पुण्यातले तांबोळी कुटुंबीय गेल्या 25 वर्षांपासून वेगवेगळे देखावे सादर करत आहेत.

आधुनिक भारताचा देखावा

कोरोना निर्बंधमुक्त गणेशोउत्सव : कोरोनामुळे गेली दोन वर्षे गणेश उत्सव साजरा करता आला नव्हता. मात्र, यंदाच्यावर्षी कोरोनाचे निर्बंध उठल्याने निर्बंधमुक्त गणेश उत्सव साजरा Ganesh Utsav free Corona restrictions केला जात आहे. त्यामुळे विविध ज्वलंत विषयावर देखावे सादर केले जात आहेत. पुण्यात घरगुती गणपतीला देखावेदेखील वेगवेगळ्या स्वरूपात सादर केले जातात.

आधुनिक भारताचा देखावा - पुण्यातल्या तांबोळी कुटुंबियांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'आधुनिक भारत' या विषयावर देखावा सादर Modern India Decoration To Ganpati केला आहे. त्यात स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि आधुनिक भारत या दोन देखाव्यातून मांडण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्यात हा देखावा चर्चेचा विषय ठरत आहे. या अगोदर त्यांनी माळीण, ऑपलम्पिक, कोरोना असे सामाजिक विषय घेऊन अनेक देखावे सादर केले आहे.

देशासाठी बलिदान - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित तरुणांना आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान दिले. त्या स्वातंत्र्यवीरांचे बलिदान समजावे यासाठी हा देखावा सादर करण्याचा या मागचा उद्देश आहे. या देखाव्याच्या माध्यमातुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्याची भावना या देखाव्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न तांबोळी यांनी केला आहे.

हेही वाचा - Rohingya Migrants Bangladesh : रोहिंग्या हे बांगलादेशवर 'मोठे ओझे'; समस्येवरील समाधानात भारताची मोठी भूमिका, शेख हसीना यांचे वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.