ETV Bharat / bharat

Rohingya Migrants Bangladesh : रोहिंग्या हे बांगलादेशवर 'मोठे ओझे'; समस्येवरील समाधानात भारताची मोठी भूमिका, शेख हसीना यांचे वक्तव्य

author img

By

Published : Sep 4, 2022, 12:43 PM IST

स्थलांतरित रोहिंग्या हे बांगलादेशवर एक "मोठे ओझे" Rohingya migrants big burden on Bangladesh आहेत . बांगलादेश हा देश त्यांना मायदेशी परत जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाची मदत घेत आहे. हे सांगताना पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या की, त्यांना वाटते की भारत ही समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. Over a million Rohingya migrants big burden on Bangladesh says Sheikh Hasina

Prime Minister of Bangladesh Sheikh Hasina
बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना

ढाका (बांगलादेश) - रोहिंग्या स्थलांतरितांचे बांगलादेशवर "मोठे ओझे" Rohingya migrants big burden on Bangladesh आहे. त्यांना मायदेशी परत जाता यावे, यासाठी बांगलादेश आंतरराष्ट्रीय समुदायाची मदत घेत आहे. हे सांगताना पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या की, त्यांना वाटते की भारत ही समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना हसीना यांनी कबूल केले की, बांगलादेशात लाखो रोहिंग्यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या राजवटीला आव्हाने निर्माण झाली आहेत. त्या म्हणाल्या, की हे आमच्यासाठी खूप मोठे ओझे आहे. भारत हा एक विशाल देश आहे. तुम्ही येथे संख्या आणखी समायोजित करू शकता. पण बांगलादेशात आमच्याकडे 1.1 दशलक्ष रोहिंग्या आहेत. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदाय आणि शेजारी देशांशी सल्लामसलत करत आहोत, त्यांनीही काही पावले उचलली पाहिजेत जेणेकरून ते मायदेशी परत जातील. Rohingya migrants

रोहिग्यांना मानवतावादी आधारावर आश्रय - बांगलादेशच्या पंतप्रधानांनी Bangladesh Prime Minister Sheikh Hasina सांगितले की, त्यांच्या सरकारने मानवतावादी पैलू लक्षात घेऊन विस्थापित समुदायाची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्या म्हणाल्या की, आम्ही रोहिग्यांना मानवतावादी आधारावर आश्रय देतो. या कोविड दरम्यान, आम्ही सर्व रोहिंग्या समुदायाचे लसीकरण केले. पण ते इथे किती दिवस राहणार? ते छावणीत राहत आहेत. जे आपल्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते. काही लोक अंमली पदार्थ आणि महिलांची तस्करी किंवा हिंसक संघर्षात गुंतलेले आढळले आहेत, असे ते म्हणाले. दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. त्यामुळे ते जितक्या लवकर मायदेशी परततील तितके आपल्या देशाचे आणि म्यानमारचे चांगले होईल. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी आणि आसियान किंवा UNO सारख्या आंतरराष्ट्रीय समुदायाशी, नंतर इतर देशांशी चर्चा करत आहोत.

पंतप्रधान हसीना सोमवारपासून भारत दौऱ्याला सुरुवात - बांगलादेशच्या पंतप्रधानांनी सांगितले की, रोहिंग्यांना अनेक अडचणी येत असताना त्यांच्या देशाने त्यांना आश्रय दिला होता. हसीना म्हणाल्या, पण आता त्यांनी आपल्या देशात परत जावे. त्या म्हणाल्या की, मला असे वाटते की एक शेजारी देश म्हणून भारत यात मोठी भूमिका बजावू शकतो. पंतप्रधान हसीना सोमवारपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. मुलाखतीदरम्यान, हसीना यांना नदीच्या पाणीवाटपाबाबत, विशेषत: तीस्ता नदीच्या संदर्भात भारतासोबतच्या सहकार्याबद्दल विचारण्यात आले. हसीना म्हणाल्या की, आव्हाने आहेत, पण ती आपापसात सोडवता येतील.

भारताने या समस्येकडे अधिक व्यापकपणे पाहिले तर तोडगा निघेन - आम्ही डाउनस्ट्रीममध्ये आहोत. भारतातून पाणी येत आहे, त्यामुळे भारताने या समस्येकडे अधिक व्यापकपणे पाहिले पाहिजे. जेणेकरून दोन्ही देशांना फायदा होईल. कधीकधी आमच्या लोकांना खूप त्रास होतो. शेतकऱ्यांना पिके घेता येत नाहीत. त्यावर तोडगा निघेल अशी आशा आहे. त्या म्हणाल्या की, दोन्ही देशांनी गंगा नदीचे पाणी वाटून घेतले. आम्ही करारावर स्वाक्षरी केली. आपल्याकडे आणखी 54 नद्या आहेत. मात्र गंगेच्या पाण्यावरच हा करार होऊ शकला. Over a million Rohingya migrants big burden on Bangladesh says Sheikh

हेही वाचा Five JDU MLAs join BJP: जेडीयूच्या पाच आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, पाहा काय म्हणाले नितीश कुमार

etv play button
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.