ETV Bharat / state

Nana Patole Jan Samvad Yatra : ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावून राज्याला...नाना पटोलेंचा गंभीर आरोप

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2023, 8:48 PM IST

Nana Patole Jan Samvad Yatra काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जन संवाद यात्रेत भाजपा सरकारवर कडाडून टीका केलीय. राज्य सरकारनं कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जीआर काढल्याबाबतही काँग्रेस प्रदेशाध्याक्षांनी प्रतिक्रिया दिलीय.

Nana Patole Jan Samvad Yatra
Nana Patole Jan Samvad Yatra

नागपूर Nana Patole Jan Samvad Yatra - मराठा आरक्षणाचा गंभीर विषय हाताळण्यात भाजपाने सर्वात मोठी चुक केली आहे. सत्तेसाठी काहीपण ही भुमिकाचं आता भाजपाच्या अंगलट आल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते आज नागपूर येथे जन संवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की बंजारा समाजाला आदिवासीत स्थान दिले जाईल. त्याचंबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं. परंतु अद्याप ते आश्वासन पूर्ण केलं नाही. इतर समाजाचं आरक्षण कमी करून राज्याला मणिपूर करण्याचा डाव असल्याचा अतिशय गंभीर असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केलाय.

वैयक्तिक जातीचं प्रमाणपत्र देता येत नाही- जर कुणाला कुठल्या जातीचं प्रमाणपत्र द्यायचं असेल तर त्यांच्या कुळावर जावं लागते. जातीचे वैयक्तिक प्रमाणपत्र देता येणार नाही. त्यामुळेच आंदोलन सुरू झालय. ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या गोष्टी जमत नाही, त्याचं आश्वासन भाजपाने द्यायला नको होतं. सध्याच्या समस्येवर तोडगा काढायचा असेल तर जातीनुसार जणगणना हाच पर्याय असल्याचं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे.

ओबीसी आग आहे, नादाला लागू नका - ओबीसींना महाराष्ट्रात फक्त १९ टक्के आरक्षण आहे. गडचिरोलीत तर ओबीसी आरक्षणाची टक्केवारी ही केवळ २ टक्केचं आहे. मोदी सरकारनं ५ दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावूनही अजेंडा अद्याप ठरला नाही. यांना आरक्षणाची ५० टक्क्यांची मार्यादा सरकारला ओलांडायची नाही. ओबीसी आग आहे, त्याच्या भानगडीत सरकारने पडू नये, हा आमचा इशारा आहे. ओबीसी समाजाला केवळ १९ टक्के आरक्षण मिळत आहे. राज्यात ओबीसीची संख्या ५६ टक्के आहे.

आगामी निवडणुकीत काँग्रेस ८० टक्के तरुण पिढीला तिकीट देणार आहे. प्रणिती शिंदे यांनासुद्धा तिकिट देण्यात येईल. आमच्याकडे खूप उमेदवार आहेत-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले


केंद्रात व राज्यात तुमच्या विचारांचं सरकार- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचं समर्थन केलं. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले केंद्रासह राज्यात तुमच्याचं विचाराचे सरकार कार्यरत आहे. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त करण्याची मागणी सरकारकडे करावी, असं ते म्हणाले आहेत. सरसंघचालकांनी आता अखंड भारतासोबत मणिपूर आणि काश्मिरबाबतंही बोलावं. तिथे निवडणुक होत नाही. लोकांच्या अनेक समस्या असताना त्याबाब बोलावं. त्यांना कुठला अखंड भारत हवा आहे? असा प्रश्नही नाना पटोले यांनी उपस्थित केलाय.

हेही वाचा-

  1. Maratha Reservation: मराठवाड्यातील कुणबी दस्तावेज तपासण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर, 48 तासांमध्ये तपशील कळवण्याचे निर्देश
  2. Maratha Reservation Protest : प्रकृती खालावली रुग्णालयात जाण्यास नकार, रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार - देविदास पाठे
  3. kunbi certificate GR : कुणबी प्रमाणपत्राचा राज्य सरकारनं काढला अध्यादेश, मनोज जरांगे अजूनही उपोषणावर ठाम, कारण...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.