मुंबई - भाजपचे प्रमुख केंद्र दिल्लीत आहे, असे असतानाही आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. याचा अर्थ म्हणजे भाजपला दिल्लीतील जनतेने नाकारले आहे, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यामुळे देशातही त्याचा परिणाम दिसत असल्याचेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, दिल्लीत आपची सत्ता उलटविण्यासाठी भाजपने दिग्गज नेते उतरवले. मात्र, तरीदेखील त्यांचा पराभव झाला. यात पुढील भविष्याची दिशा दिसत आहे. तसेच दिल्लीत बसणाऱ्या लोकांनाच तेथील जनतेने नाकारले गेले, असे आम्ही मानतो. भाजपचा अहंकार लोक उतरवतात हे आजच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. राज्याप्रमाणे देशालाही वेगळा पर्याय मिळेल, असेही मंत्री अनिल परब म्हणाले.