महाराष्ट्र

maharashtra

Nana Patole on Parliament Special session: संसदेचं विशेष अधिवेशन का बोलाविलं? नाना पटोले म्हणाले मोदी सरकारचा डाव...

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 9:51 PM IST

मोदी सरकारनं बोलाविलेल्या विशेष अधिवेशनावरून विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संसदेचे अधिवेशन मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याकरिता घेण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला.

Nana Patole on Parliament Special session
Nana Patole on Parliament Special session

मुंबई- संसदेचे आगामी विशेष अधिवेशन हे देशाचे तुकडे करणाकरिता आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे करण्याकरिता बोलाविण्यात आले. हा आगामी विशेष अधिवेशनाचा अजेंडा असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेम्हणाले की, मोदी सरकारनं 18 ते 22 सप्टेंबरच्या अधिवेशनाचा कोणताही अजेंडा केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं संसदीय कामकाज समितीसह विरोधी पक्षालाही न विचारता हे अधिवेशन बोलावले आहे. मात्र, नोटाबंदी, मणिपूर हिंसाचार अशा प्रश्नावर कोणतीही विशेष सत्र बोलाविण्यात आलं नव्हतं.

मोदी सरकारला देशाचे विभाजन करून महाराष्ट्रापासून मुंबईला वेगळे करायचे आहे. त्यासाठी मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करणे हा अधिवेशनाचा हेतू आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला. मुंबई ही देशाची आर्थिक केंद्र असून राज्य व देशाचे भूषण आहे. मात्र, भाजपानं गेल्या नऊ वर्षांपासून मुंबईचे महत्त्व पद्धतशीरपणे कमी करण्याचा प्रयत्न केलाय. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न खूप दिवसांपासून सुरू आहे. हिरे उद्योग, ग्लोबल फायनान्शियल सेंटर आणि एअर इंडियाचे मुख्यालय मुंबईतून हलविण्यात आले. आता मुंबईपासून वेगळं करण्याच्या कटाचा भाग म्हणून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे स्थलांतर करण्याचा प्लॅन असल्याचाही दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केलाय.

महाविकास आघाडीच्या काळात भाजपाला महाराष्ट्रापासून मुंबई वेगळं करणं शक्य नव्हतं. त्यामुळेच केंद्र सरकार आणि राज्यपालांच्या मदतीनं महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आले. -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

पंतप्रधानांना जाब विचारावा-शिंदे फडणवीस सरकारच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प गुजरातला ‘हायजॅक’ करण्यात आले आहेत. या सगळ्याला विरोध करण्याची हिंमत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नसल्याचा टोलादेखील पटोले यांनी लगावला. हिंमत असेल तर त्यांनी त्याबाबत पंतप्रधानांना जाब विचारावा, असे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

संजय राऊत यांनीदेखील केला होता आरोप-मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा आणि केंद्रशासित करण्याचा भाजपाचा डाव असल्याचा धक्कादायक आरोप खासदार संजय राऊत यांनीदेखील यापूर्वी केलाय. भाजपाला सर्व आर्थिक निधी पुरवणारा मुंबईतील बडा बिल्डर भाजपाशी संबंधित आहे. मराठी माणसाचा मुंबईतील टक्का कमी झाल्याचे भाजपाकडून भासवलं जात आहे. मात्र, महाराष्ट्रापासून मुंबई कधीही वेगळी होऊ देणार नाही. भाजपचा डाव हाणून पाडणार, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एप्रिल २०२३ मध्ये माध्यमांशी बोलताना म्हटलयं.

(IANS)

हेही वाचा-

  1. Nana Patole Jan Samvad Yatra : ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावून राज्याला...नाना पटोलेंचा गंभीर आरोप
  2. Congress Jan Samvad Yatra: काँग्रेसची राज्यभरात जनसंवाद यात्रा सुरू, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लढा- नाना पटोले

ABOUT THE AUTHOR

...view details