मुंबई :या महाराष्ट्र दौर्यादरम्यान जुन्या शिवसैनिकांच्या गाठीभेटी आमदार खासदारांच्या बैठका घेण्यावर यावेळी भर दिला जाणार आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, असा महत्वपूर्ण निकाल दिला. हजारो शिवसैनिकांची मातोश्री रीघ लागली. गर्दी वाढल्याने उद्धव ठाकरे यांनी मातोश्री समोरील चौकात गाडीच्या टफावरून शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. महाशिवरात्रीच्या दिवशी चोरांनी शिवधनुष्य बाण चोरला आहे. मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला आहे. निवडणूक आयोगाने गुलामी केली. सरकारी यंत्रणा गुलाम बनल्या आहेत. शिवसेना संपवणे शक्य नाही. शिवसैनिकांची ताकद जोपर्यंत आहे, तोपर्यंत कितीही गद्दारांच्या पिढ्या आल्या तरी त्यांना पुरून उरणार, असा सूचक इशारा उध्दव ठाकरेंनी दिला.
शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न : शिवधनुष्य चोरून नेला आहे. रावणाने देखील शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उताणा पडला होता. गद्दारांना पक्षाचे नाव, चिन्ह आणि बाळासाहेबांचा चेहरा हवा आहे. स्वतःचे काही कर्तुत्व नाही. ज्या चोरांनी धनुष्यबाण चोरलेले आहे, मर्द असतील तर त्यांनी चोरलेले धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरे जावे. आम्ही मशाल घेऊन निवडणुकीत उतरतो, अशा शब्दांत लालकरले. तसेच ही लढाई आता सुरू झाली आहे. निवडणुका होऊन जाऊ दे. ताकद आणि हिमतीचे शिवसैनिक जोपर्यंत उभे आहेत, तोपर्यंत कोणीही शिवसेना संपवणार नाही, असे थेट आव्हान ठाकरेंनी शिंदे गट, भाजप आणि निवडणूक आयोगाला दिले आहे.