ETV Bharat / politics

वर्धा लोकसभा मतदारसंघ : 'महात्मा गांधींच्या कर्मभूमी'त तिसऱ्यांदा कमळ फुलणार? काय असेल लोकसभेचं समीकरण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 11:45 AM IST

Wardha Loksabha 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केलीय. वर्धा लोकसभा मतदारसंघात उमेदवाराबाबत कॉंग्रेस द्विधा मनस्थितीत आहे. तर भाजपाकडून विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या नावाची चर्चा आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघ  काय असेल लोकसभेचं समीकरण
वर्धा लोकसभा मतदारसंघ काय असेल लोकसभेचं समीकरण

वर्धा Wardha Loksabha 2024 : कधीकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून वर्धा लोकसभा मतदारसंघ ओळखला जायचा. पण आज इथं भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य आहे. वर्धाचे विद्यमान खासदार रामदास तडस हे भाजपाचे नेते असून ते सलग दोन वेळा इथून निवडून आले आहेत. रामदास तडस यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याच्या बाबत जरा साशंकता आहे. मागील 2019 च्या निवडणुकीत त्यांनी चारुलता टोकस यांना पराभूत केलं होतं. यंदा भाजपा इथून नवीन उमेदवार देण्याची शक्यता आहे.

दिग्गजांनी केलं प्रतिनिधित्व : 1952 साली हा मतदारसंघ अस्तित्वात आला होता. तेव्हा पहिले खासदार म्हणून काँग्रेसचे श्रीमन अग्रवाल निवडून आले होते. त्यानंतर सलग तीन वेळा कमल नयन बजाज वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर वसंत साठे यांनी देखील तीन टर्म वर्धा लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे रामचंद्र घंगारे यांनी वसंत साठे यांची घोडदौड रोखली होती. प्रभा राव, दत्ता मेघे, सुरेश वाघमारे यांनीही आतापर्यंत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.

वर्धा लोकसभेची रचना : वर्धा जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी व देवळी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तसंच अमरावती जिल्ह्यातील धामणगाव व मोर्शी विधानसभाही वर्धा लोकसभा क्षेत्रात येतात. वर्धा जिल्ह्यात तेली समाजातील मतदारांचं सर्वाधिक प्राबल्य आहे. तसंच कुणबी मतदार देखील निर्णायक भूमिका बजाऊ शकतात. जिल्ह्यात 16 लाख मतदार आहेत. जिल्ह्यातील 4 पैकी 3 विधानसभा मतदारसंघांवर भाजपाचं वर्चस्व आहे. वर्धा, हिंगणघाट आणि आर्वी या मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत तर देवळी मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे.

वर्धा शहराची ऐतिहासिक ओळख : वर्धा या शहराचं नाव 'वरदा' नदीच्या नावावरुन पडलं आहे. पूर्वीच्या काळातील 'वरदा' नदी ही आज 'वर्धा' नदी नावानं ओळखली जाते. वर्धा शहराला फार मोठा प्रगल्भ इतिहास लाभलाय. ब्रिटीशांच्या काळात म्हणजे 1862 पर्यंत वर्धा शहर नागपूरचा एक भाग होता. मात्र त्यानंतर प्रशासकीय कारणानं वर्धा वेगळा करण्यात आला. पुलगाव जवळील कवठा इथं वर्ध्याचं जिल्हा मुख्यालय उभारण्यात आलं. पण नंतर 1966 मध्ये वर्धा हे पालकवाडी जवळ वसविण्यात आलं. स्वातंत्र्य लढ्यात वर्ध्याचं महत्व फार होतं. महात्मा गांधी यांनी वर्ध्यातूनचं स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली होती. तर 1951 साली गांधी यांचे शिष्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली होती. या चळवळीला रक्तहीन क्रांती म्हणून ओळखलं जातं.

वर्धा महात्मा गांधीची कर्मभूमी : वर्धा लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. कारण वर्धा नावाच्या अवती-भवती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाचं वलय आहे. वर्धा महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. 1940 साली गांधीजींनी वर्धा शहराच्या अगदी लगत असलेल्या सेगाव या गावाचं नामकरण सेवाग्राम असं केलं होतं. तेव्हा पासूनच वर्धा शहराचं नाव इतिहासाच्या पानात अमर झालं असं म्हटल्यास वावगं ठरु नये. आजही वर्धेच्या सेवाग्राम येथे 'महात्मा गांधी' यांचा आश्रम अगदी दिमाखात उभा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाग्राम आश्रम भारताच्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीचं केंद्र बनला होता. या ठिकाणी आजही त्या काळातील आठवणींच्या पाऊलखुणा शाबूत आहेत.

विनोबा भावे यांची भूदान चळवळ : आचार्य विनोबा भावे महात्मा गांधींचे अनुयायी होते. विनोबा भावे यांची गणना देशातील महान स्वातंत्र्य सैनिक आणि समाजसेवकांमध्ये केली जाते. 1958 साली आंतरराष्ट्रीय रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय होते. 1983 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्नही प्रदान करण्यात आला. विनोबा भावे यांनी देशात भूदान चळवळ सुरू केली. ते भूदान चळवळीचे प्रणेते होते. भूदान म्हणजे जमीन दान करणे. भूदान चळवळ ही स्वेच्छेनं करण्याची जमीनसुधारणा चळवळ विनोबांनी सुरू केली होती.

दहा वर्षांपासून मतदारसंघावर भाजपाची सत्ता : सलग नऊ वेळा वर्धा लोकसभा मतदारसंघात सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेस पक्षाला 1991 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा पाहिला धक्का बसला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामचंद्र घंघारे यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते वसंत साठे यांना पराभूत केलं. त्यानंतर मात्र, काँग्रेसचं लक्ष हळूहळू वर्धा मतदारसंघात कमकुवत होत गेलं तर आता भापजानं मतदारसंघात आपली ताकद वाढवलीय. भाजपाचे रामदास तडस 2014 पासून खासदार आहेत.

रामदास तडस पुन्हा इच्छुक : 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वर्ध्यातून भाजपाच्या रामदास तडस यांनी काँग्रेसच्या सागर मेघेंचा 2,15,783 मतांनी पराभव केला होता. तर 2019 मध्ये काँग्रेसकडून प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. रामदास तडस यांनी चारुलता टोकस यांना अडीच लाख मतांनी पराभूत केलं होतं. रामदास तडस आता तिसऱ्यांदा इच्छुक आहेत. पण भाजपा उमेदवार बदलेल अशी चर्चा आहे. भाजपाची घोडदौड रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून रामदास तडस यांना फाईट देईल असा तगडा उमेदवार शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

काँग्रेस द्विधा मनस्थितीत : विधानसभेच्या 4 मतदारसंघात भाजपा जोमानं कामाला लागलीय तर काँग्रेस अद्याप द्विधा मनस्थितीत असल्याचं बघायला मिळतंय. काँग्रेसच्या संभाव्य नावांमध्ये माजी आमदार अमर काळे, शैलेश अग्रवाल, चारुलता टोकस, विद्यमान आमदार रणजित कांबळे यांची नावं पुढं येत आहेत. परंतु, आमदारकी सोडून खासदारकी लढण्यास नेते तयार नाहीत. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्या नावावरही चर्चा सुरू आहे.

नागरिकांच्या समस्या : वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वात मोठा प्रश्न बेरोजगारीचा आहे. कारण महात्मा गांधींचा जिल्हा असल्यामुळं इथं उद्योग बंदी आहे. जिल्ह्यात पुरेसे उद्योग नसल्यामुळं तरुणांना कामधंद्याकरता नागपूरसह मुंबई व पुण्याकडं जावं लागतं. जिल्ह्यात शेतकरीवर्ग सर्वात मोठा आहे. मात्र, कृषी उत्पादनाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी नाराज आहेत. रस्ते पाण्याची देखील समस्या मोठी आहे.



हेही वाचा :

  1. 'कोळशाच्या खाणी'त कोणाच्या 'विजाया'चा 'चंद्र'? कॉंग्रेस 'प्रतिभा' राखणार की भाजपाचं 'कमळ' पुन्हा फुलणार, काय असेल समीकरण?
  2. चालिसा पठणामुळं तुरुंगात गेलेल्या नवनीत राणांना लोकसभेत 'हनुमान' पावणार का? काय आहे समीकरण?

वर्धा Wardha Loksabha 2024 : कधीकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून वर्धा लोकसभा मतदारसंघ ओळखला जायचा. पण आज इथं भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य आहे. वर्धाचे विद्यमान खासदार रामदास तडस हे भाजपाचे नेते असून ते सलग दोन वेळा इथून निवडून आले आहेत. रामदास तडस यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याच्या बाबत जरा साशंकता आहे. मागील 2019 च्या निवडणुकीत त्यांनी चारुलता टोकस यांना पराभूत केलं होतं. यंदा भाजपा इथून नवीन उमेदवार देण्याची शक्यता आहे.

दिग्गजांनी केलं प्रतिनिधित्व : 1952 साली हा मतदारसंघ अस्तित्वात आला होता. तेव्हा पहिले खासदार म्हणून काँग्रेसचे श्रीमन अग्रवाल निवडून आले होते. त्यानंतर सलग तीन वेळा कमल नयन बजाज वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर वसंत साठे यांनी देखील तीन टर्म वर्धा लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे रामचंद्र घंगारे यांनी वसंत साठे यांची घोडदौड रोखली होती. प्रभा राव, दत्ता मेघे, सुरेश वाघमारे यांनीही आतापर्यंत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.

वर्धा लोकसभेची रचना : वर्धा जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी व देवळी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तसंच अमरावती जिल्ह्यातील धामणगाव व मोर्शी विधानसभाही वर्धा लोकसभा क्षेत्रात येतात. वर्धा जिल्ह्यात तेली समाजातील मतदारांचं सर्वाधिक प्राबल्य आहे. तसंच कुणबी मतदार देखील निर्णायक भूमिका बजाऊ शकतात. जिल्ह्यात 16 लाख मतदार आहेत. जिल्ह्यातील 4 पैकी 3 विधानसभा मतदारसंघांवर भाजपाचं वर्चस्व आहे. वर्धा, हिंगणघाट आणि आर्वी या मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत तर देवळी मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे.

वर्धा शहराची ऐतिहासिक ओळख : वर्धा या शहराचं नाव 'वरदा' नदीच्या नावावरुन पडलं आहे. पूर्वीच्या काळातील 'वरदा' नदी ही आज 'वर्धा' नदी नावानं ओळखली जाते. वर्धा शहराला फार मोठा प्रगल्भ इतिहास लाभलाय. ब्रिटीशांच्या काळात म्हणजे 1862 पर्यंत वर्धा शहर नागपूरचा एक भाग होता. मात्र त्यानंतर प्रशासकीय कारणानं वर्धा वेगळा करण्यात आला. पुलगाव जवळील कवठा इथं वर्ध्याचं जिल्हा मुख्यालय उभारण्यात आलं. पण नंतर 1966 मध्ये वर्धा हे पालकवाडी जवळ वसविण्यात आलं. स्वातंत्र्य लढ्यात वर्ध्याचं महत्व फार होतं. महात्मा गांधी यांनी वर्ध्यातूनचं स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली होती. तर 1951 साली गांधी यांचे शिष्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली होती. या चळवळीला रक्तहीन क्रांती म्हणून ओळखलं जातं.

वर्धा महात्मा गांधीची कर्मभूमी : वर्धा लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. कारण वर्धा नावाच्या अवती-भवती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाचं वलय आहे. वर्धा महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. 1940 साली गांधीजींनी वर्धा शहराच्या अगदी लगत असलेल्या सेगाव या गावाचं नामकरण सेवाग्राम असं केलं होतं. तेव्हा पासूनच वर्धा शहराचं नाव इतिहासाच्या पानात अमर झालं असं म्हटल्यास वावगं ठरु नये. आजही वर्धेच्या सेवाग्राम येथे 'महात्मा गांधी' यांचा आश्रम अगदी दिमाखात उभा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाग्राम आश्रम भारताच्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीचं केंद्र बनला होता. या ठिकाणी आजही त्या काळातील आठवणींच्या पाऊलखुणा शाबूत आहेत.

विनोबा भावे यांची भूदान चळवळ : आचार्य विनोबा भावे महात्मा गांधींचे अनुयायी होते. विनोबा भावे यांची गणना देशातील महान स्वातंत्र्य सैनिक आणि समाजसेवकांमध्ये केली जाते. 1958 साली आंतरराष्ट्रीय रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय होते. 1983 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्नही प्रदान करण्यात आला. विनोबा भावे यांनी देशात भूदान चळवळ सुरू केली. ते भूदान चळवळीचे प्रणेते होते. भूदान म्हणजे जमीन दान करणे. भूदान चळवळ ही स्वेच्छेनं करण्याची जमीनसुधारणा चळवळ विनोबांनी सुरू केली होती.

दहा वर्षांपासून मतदारसंघावर भाजपाची सत्ता : सलग नऊ वेळा वर्धा लोकसभा मतदारसंघात सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेस पक्षाला 1991 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा पाहिला धक्का बसला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामचंद्र घंघारे यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते वसंत साठे यांना पराभूत केलं. त्यानंतर मात्र, काँग्रेसचं लक्ष हळूहळू वर्धा मतदारसंघात कमकुवत होत गेलं तर आता भापजानं मतदारसंघात आपली ताकद वाढवलीय. भाजपाचे रामदास तडस 2014 पासून खासदार आहेत.

रामदास तडस पुन्हा इच्छुक : 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वर्ध्यातून भाजपाच्या रामदास तडस यांनी काँग्रेसच्या सागर मेघेंचा 2,15,783 मतांनी पराभव केला होता. तर 2019 मध्ये काँग्रेसकडून प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. रामदास तडस यांनी चारुलता टोकस यांना अडीच लाख मतांनी पराभूत केलं होतं. रामदास तडस आता तिसऱ्यांदा इच्छुक आहेत. पण भाजपा उमेदवार बदलेल अशी चर्चा आहे. भाजपाची घोडदौड रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून रामदास तडस यांना फाईट देईल असा तगडा उमेदवार शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

काँग्रेस द्विधा मनस्थितीत : विधानसभेच्या 4 मतदारसंघात भाजपा जोमानं कामाला लागलीय तर काँग्रेस अद्याप द्विधा मनस्थितीत असल्याचं बघायला मिळतंय. काँग्रेसच्या संभाव्य नावांमध्ये माजी आमदार अमर काळे, शैलेश अग्रवाल, चारुलता टोकस, विद्यमान आमदार रणजित कांबळे यांची नावं पुढं येत आहेत. परंतु, आमदारकी सोडून खासदारकी लढण्यास नेते तयार नाहीत. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्या नावावरही चर्चा सुरू आहे.

नागरिकांच्या समस्या : वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वात मोठा प्रश्न बेरोजगारीचा आहे. कारण महात्मा गांधींचा जिल्हा असल्यामुळं इथं उद्योग बंदी आहे. जिल्ह्यात पुरेसे उद्योग नसल्यामुळं तरुणांना कामधंद्याकरता नागपूरसह मुंबई व पुण्याकडं जावं लागतं. जिल्ह्यात शेतकरीवर्ग सर्वात मोठा आहे. मात्र, कृषी उत्पादनाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी नाराज आहेत. रस्ते पाण्याची देखील समस्या मोठी आहे.



हेही वाचा :

  1. 'कोळशाच्या खाणी'त कोणाच्या 'विजाया'चा 'चंद्र'? कॉंग्रेस 'प्रतिभा' राखणार की भाजपाचं 'कमळ' पुन्हा फुलणार, काय असेल समीकरण?
  2. चालिसा पठणामुळं तुरुंगात गेलेल्या नवनीत राणांना लोकसभेत 'हनुमान' पावणार का? काय आहे समीकरण?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.