ETV Bharat / bharat

'रामोजी ग्रुपचं विजयपथावरील मार्गक्रमण निरंतर सुरूच राहील': इच्छापत्रातून कर्मचाऱ्यांना रामोजी राव यांची भावनिक साद, सोपवली जबाबदारी - Ramoji Rao letter

Ramoji Rao Letter : मीडिया टायकून रामोजी राव यांनी रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना 'जबाबदारीचं इच्छापत्र' लिहून ठेवलं आहे. जसं वडील आपल्या मुलांना मालमत्तेचं मृत्युपत्र लिहितात, तसंच हे इच्छापत्र आहे. ते आपल्या पत्रात म्हणतात की, रामोजी समूह मजबूत प्रणालीवर उभारला आहे. त्याची विजयी वाटचाल कुणालाही थांबवता येणार नाही. त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला सर्जनशील सामर्थ्यानं आव्हानांवर मात करून नोकरीमध्ये आणि जीवनात प्रगती करण्याचं आवाहन केलंय.

Ramoji Rao
रामोजी राव (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 8:01 PM IST

Updated : Jun 10, 2024, 9:02 PM IST

हैदराबाद Ramoji Rao Letter : रामोजी समूहाचे अध्यक्ष रामोजी राव यांनी त्यांच्या गौरवशाली जीवनकाळात अफाट व्यवसाय विश्व आणि मीडिया साम्राज्य निर्माण केलय. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल मीडियामध्ये पसरलेल्या या कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात; त्याचबरोबर आदरातिथ्य-हॉटेल, चित्रपट, मनोरंजन तसंच FMCG क्षेत्रात रामोजी ग्रुपच्या उद्योगांचं मोठं जाळं पसरलेलं आहे.

या सर्वच उद्योगातील कर्मचाऱ्यांसाठी, माध्यम सम्राट रामोजी राव यांनी 'जबाबदारीचं इच्छापत्र' लिहिलं आहे. सहसा, वडील त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात त्यांच्या मुलांना मालमत्तेचं वाटप करण्यासाठी मृत्यूपत्र लिहितात. येथे चेअरमन रामोजी राव यांनी कर्मचाऱ्यांवर जबाबदारीचं मृत्युपत्र दिलेलं आहे. जसं वडील आपल्या मुलांसाठी इच्छापत्र लिहितात, तसंच त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी इच्छापत्र लिहिलं आहे. रामोजी राव यांना त्यांच्या कंपन्यांच्या समूहातील कर्मचारी हे त्यांच्या मुलांच्यापेक्षाही प्रिय होते. त्यांच्यासाठी त्यांनी काय लिहिलं असेल?

रामोजी राव
ईटीव्ही भारतच्या शुभारंभ प्रसंगी रामोजी राव आणि इतर (ईटीव्ही भारत, संग्रहित छायाचित्र)

ही आहे रामोजी राव यांची प्रेरणादायी इच्छा :

"प्रत्येक कर्मचाऱ्याने सर्जनशीलतेने आव्हानांवर मात करून सक्षम आणि वचनबद्ध सैनिक म्हणून काम केलं पाहिजं. सदैव खंबीरपणे उभे राहण्यासाठी मी उभारलेल्या संस्था आणि प्रणालींचा पाया तुम्ही आहात."

रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितल्या प्रमाणे, 'माझ्या आयुष्याच्या आकाशात आता ढग जमा होत आहेत. पावसासाठी नाही, वादळांसाठी नाही - माझ्या संध्याकाळसाठी नवे रंग रंगवण्यासाठी.' अनेक दशके, मी एका अथक कार्यकर्त्याप्रमाणे धावत राहिलो, अनेक दशकांमधला वेळ नकळत, प्रत्येक पहाट माझ्या हृदयाला सूर्यदेवाच्या पहिल्या किरणांनी प्रेरित केलेल्या चेतनेने भरून टाकते आणि सात घोड्यांचा सूर्य रथ त्याच्या प्रेरणेने माझ्या बुद्धीला आणि सर्जनशीलतेला मजबूत करतो.' हे विश्वकवींचे शब्द माझ्या मनात भरून येतात!

मी वृद्ध झालो तरी माझ्या मनात नवनवीन कल्पनांचे नेहमीच धुमारे फुटतात, त्यातून एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे 'बदल शाश्वत आहे... बदल हाच सत्य आहे'. रामोजी ग्रुप परिवाराचा प्रमुख या नात्याने मी तुम्हा सर्वांना हे पत्र लिहिण्यास प्रवृत्त झालो, कधी आणि कुठे कळत नाही, मात्र या गोष्टीची जाणीव व्हावी हीच इच्छा आहे. एक प्रकारे ही भविष्यातील योजना आहे. रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे कर्मचारी या नात्याने तुम्हा सर्वांना तुमच्या भव्य उद्दिष्टांसाठी शुभेच्छा!

व्यक्तीचं अनेकवचन म्हणजे शक्ती असं मी मानतो. जरी रामोजी ग्रुपच्या सर्व कंपन्या माझ्या कल्पनांच्या बुद्धीचा आविष्कार आहेत. मात्र त्या सर्व शक्तिशाली प्रणालींच्या माध्यमातून स्थापित झाल्या आहेत. त्या जगभरातील लाखो लोकांना आवडल्या आहेत. मला असे अनेक कर्मचारी माहीत आहेत, ज्यांनी या संस्थांच्या विकासात प्रत्यक्ष भूमिका बजावली आहे. त्या सर्वांनीच झटून काम केलं आहे. त्या सगळ्यांचं नावही आज घराघरात घेतलं जात आहे.

रामोजी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये काम करणे ही आदराची बाब आहे, कंपनीशी अविभाज्यपणे जोडलेले अद्वितीय वैशिष्ट्य असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांचा मला अभिमान आहे. कठोर परिश्रमाने, काहीही अशक्य नाही - हे एक व्यावसायिक तत्त्व आहे जे मी अनेक दशकांपासून निष्ठेने आचरणात आणलं आहे! म्हणून, माझ्या सर्व संस्था थेट सार्वजनिक हिताशी जोडलेल्या आहेत. त्यातील कर्मचारी अशा पद्धतीने कार्यरत आहेत की ते कार्यतत्परतेचा मुकुटमणी ठरावेत. अनेक दशकांपासून माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या आणि माझी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात मला मदत करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार!

आपण हाती घेतलेलं कोणतंही काम किंवा हाती घेतलेला प्रकल्प हा एकमेवाद्वितीयच असला पाहिजे, ते दुसऱ्या क्रमांकाचेही कधीच असू नयेत, हा माझा आयुष्यभर आग्रह राहिला आहे. त्या आकांक्षेनं, मी अक्षरशः जीवनभर झिजून मार्गदर्शी ते ETV भारत पर्यंत सर्व काही सर्वोत्तम केलं, तेलुगु अस्मितेच्या अभ्युदयाचा झेंडा नेहमीच उंच फडकवत ठेवला.

माझी आकांक्षा आहे की, मी उभारलेल्या संस्था आणि त्यातील कामाच्या पद्धती चिरकाल टिकतील. हजारो लोकांच्या रोजगारावर थेट आणि अप्रत्यक्षपणे हजारो लोकांच्या उपजीविकेवर अवलंबून असलेल्या रामोजी समूहाच्या कंपन्यांचे भविष्य बलवान करण्यासाठी मी मजबूत व्यवस्थापन आणि मार्गदर्शक पाया तयार केला आहे. माझ्यानंतरही तुम्ही सर्वांनी तुमच्या कार्याशी कटिबद्ध राहावे, जेणेकरून या उदात्त परंपरा सदैव चालू राहतील आणि रामोजी संस्थांचा नावलौकिक वाढेल.

माहिती, विज्ञान, मनोरंजन, विकास ही चार प्रमुख क्षेत्रे आहेत जी कोणत्याही राष्ट्राचे भविष्य उज्ज्वल करतात. रामोजी ग्रुपच्या सर्व कंपन्या याच चार स्तंभांवर उभ्या राहून सतत सार्वजनिक सेवेत सहभागी होतात. त्यावर नेहमीच जनतेचा विश्वास अबाधित राहिलेला आहे.

रामोजी राव
ईटीव्ही भारत अ‍ॅप लाँच करताना रामोजी राव (ईटीव्ही भारत, संग्रहित छायाचित्र)

'ईनाडूचा धगधगता पत्रकारितेतील विजयी प्रवास; 'उषोदय' आणि इतर प्रकाशनांची उपयुक्तता जगभर आहे. राज्याच्या सीमा ओलांडून पसरलेली 'मार्गदर्शी' कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी अक्षरशः सोने आहे. 'ईटीव्ही' आणि 'ईटीव्ही भारत' नेटवर्क हेच आमचं बलस्थान आहे, जे देशभर पसरलं आहे. 'तेलुगु फ्लेवर्स'ची ॲम्बेसेडर म्हणून 'प्रिया'चं स्थान भक्कम आहे. रामोजी फिल्म सिटी ही देशाची शान आहे.

या सर्वांमध्ये, सर्वच गोष्टींच्या यशामध्ये तू (कर्मचारी) माझी सेना आहेस. 'रामोजी' हे शिस्तीचे प्रतिनाम आहे! तुमची नाळ कर्मचारी म्हणून संस्थेशी जोडली जाते. नोकरी आणि तुमच्या आयुष्याची प्रगती होत राहील. सर्जनशील शक्तीने येणाऱ्या आव्हानांवर मात करा. रामोजी ग्रुपचा दिग्विजयी प्रवास न थांबणारा आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने सक्षम आणि वचनबद्ध सैनिक म्हणून वाटचाल करत राहावे!

रामोजी ग्रुप ऑफ कंपनीज हा अटल विश्वासाची निशाणी आहे. मी जबाबदारीचं इच्छापत्र लिहिलय, त्यावर मार्गक्रमण करण्याचं आवाहन तुम्हाला करतो!"

हेही वाचा...

रामोजी रावांनी मृत्यूपूर्वीच बांधलं होतं स्वत:चं स्मारक!

रामोजी रावांच्या आयुष्यातील सोनेरी क्षण, कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो पाहा....

रामोजी फिल्म सिटी एक जादुई ठिकाण! जिथं स्वप्नं सत्यात उतरतात

फिल्मी दुनियेत रामोजी रावांचाच दबदबा; 'ईटीव्ही मराठी'च्या माध्यमातून दिल्या सुपरहिट मालिका

हैदराबाद Ramoji Rao Letter : रामोजी समूहाचे अध्यक्ष रामोजी राव यांनी त्यांच्या गौरवशाली जीवनकाळात अफाट व्यवसाय विश्व आणि मीडिया साम्राज्य निर्माण केलय. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल मीडियामध्ये पसरलेल्या या कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात; त्याचबरोबर आदरातिथ्य-हॉटेल, चित्रपट, मनोरंजन तसंच FMCG क्षेत्रात रामोजी ग्रुपच्या उद्योगांचं मोठं जाळं पसरलेलं आहे.

या सर्वच उद्योगातील कर्मचाऱ्यांसाठी, माध्यम सम्राट रामोजी राव यांनी 'जबाबदारीचं इच्छापत्र' लिहिलं आहे. सहसा, वडील त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात त्यांच्या मुलांना मालमत्तेचं वाटप करण्यासाठी मृत्यूपत्र लिहितात. येथे चेअरमन रामोजी राव यांनी कर्मचाऱ्यांवर जबाबदारीचं मृत्युपत्र दिलेलं आहे. जसं वडील आपल्या मुलांसाठी इच्छापत्र लिहितात, तसंच त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी इच्छापत्र लिहिलं आहे. रामोजी राव यांना त्यांच्या कंपन्यांच्या समूहातील कर्मचारी हे त्यांच्या मुलांच्यापेक्षाही प्रिय होते. त्यांच्यासाठी त्यांनी काय लिहिलं असेल?

रामोजी राव
ईटीव्ही भारतच्या शुभारंभ प्रसंगी रामोजी राव आणि इतर (ईटीव्ही भारत, संग्रहित छायाचित्र)

ही आहे रामोजी राव यांची प्रेरणादायी इच्छा :

"प्रत्येक कर्मचाऱ्याने सर्जनशीलतेने आव्हानांवर मात करून सक्षम आणि वचनबद्ध सैनिक म्हणून काम केलं पाहिजं. सदैव खंबीरपणे उभे राहण्यासाठी मी उभारलेल्या संस्था आणि प्रणालींचा पाया तुम्ही आहात."

रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितल्या प्रमाणे, 'माझ्या आयुष्याच्या आकाशात आता ढग जमा होत आहेत. पावसासाठी नाही, वादळांसाठी नाही - माझ्या संध्याकाळसाठी नवे रंग रंगवण्यासाठी.' अनेक दशके, मी एका अथक कार्यकर्त्याप्रमाणे धावत राहिलो, अनेक दशकांमधला वेळ नकळत, प्रत्येक पहाट माझ्या हृदयाला सूर्यदेवाच्या पहिल्या किरणांनी प्रेरित केलेल्या चेतनेने भरून टाकते आणि सात घोड्यांचा सूर्य रथ त्याच्या प्रेरणेने माझ्या बुद्धीला आणि सर्जनशीलतेला मजबूत करतो.' हे विश्वकवींचे शब्द माझ्या मनात भरून येतात!

मी वृद्ध झालो तरी माझ्या मनात नवनवीन कल्पनांचे नेहमीच धुमारे फुटतात, त्यातून एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे 'बदल शाश्वत आहे... बदल हाच सत्य आहे'. रामोजी ग्रुप परिवाराचा प्रमुख या नात्याने मी तुम्हा सर्वांना हे पत्र लिहिण्यास प्रवृत्त झालो, कधी आणि कुठे कळत नाही, मात्र या गोष्टीची जाणीव व्हावी हीच इच्छा आहे. एक प्रकारे ही भविष्यातील योजना आहे. रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे कर्मचारी या नात्याने तुम्हा सर्वांना तुमच्या भव्य उद्दिष्टांसाठी शुभेच्छा!

व्यक्तीचं अनेकवचन म्हणजे शक्ती असं मी मानतो. जरी रामोजी ग्रुपच्या सर्व कंपन्या माझ्या कल्पनांच्या बुद्धीचा आविष्कार आहेत. मात्र त्या सर्व शक्तिशाली प्रणालींच्या माध्यमातून स्थापित झाल्या आहेत. त्या जगभरातील लाखो लोकांना आवडल्या आहेत. मला असे अनेक कर्मचारी माहीत आहेत, ज्यांनी या संस्थांच्या विकासात प्रत्यक्ष भूमिका बजावली आहे. त्या सर्वांनीच झटून काम केलं आहे. त्या सगळ्यांचं नावही आज घराघरात घेतलं जात आहे.

रामोजी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये काम करणे ही आदराची बाब आहे, कंपनीशी अविभाज्यपणे जोडलेले अद्वितीय वैशिष्ट्य असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांचा मला अभिमान आहे. कठोर परिश्रमाने, काहीही अशक्य नाही - हे एक व्यावसायिक तत्त्व आहे जे मी अनेक दशकांपासून निष्ठेने आचरणात आणलं आहे! म्हणून, माझ्या सर्व संस्था थेट सार्वजनिक हिताशी जोडलेल्या आहेत. त्यातील कर्मचारी अशा पद्धतीने कार्यरत आहेत की ते कार्यतत्परतेचा मुकुटमणी ठरावेत. अनेक दशकांपासून माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या आणि माझी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात मला मदत करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार!

आपण हाती घेतलेलं कोणतंही काम किंवा हाती घेतलेला प्रकल्प हा एकमेवाद्वितीयच असला पाहिजे, ते दुसऱ्या क्रमांकाचेही कधीच असू नयेत, हा माझा आयुष्यभर आग्रह राहिला आहे. त्या आकांक्षेनं, मी अक्षरशः जीवनभर झिजून मार्गदर्शी ते ETV भारत पर्यंत सर्व काही सर्वोत्तम केलं, तेलुगु अस्मितेच्या अभ्युदयाचा झेंडा नेहमीच उंच फडकवत ठेवला.

माझी आकांक्षा आहे की, मी उभारलेल्या संस्था आणि त्यातील कामाच्या पद्धती चिरकाल टिकतील. हजारो लोकांच्या रोजगारावर थेट आणि अप्रत्यक्षपणे हजारो लोकांच्या उपजीविकेवर अवलंबून असलेल्या रामोजी समूहाच्या कंपन्यांचे भविष्य बलवान करण्यासाठी मी मजबूत व्यवस्थापन आणि मार्गदर्शक पाया तयार केला आहे. माझ्यानंतरही तुम्ही सर्वांनी तुमच्या कार्याशी कटिबद्ध राहावे, जेणेकरून या उदात्त परंपरा सदैव चालू राहतील आणि रामोजी संस्थांचा नावलौकिक वाढेल.

माहिती, विज्ञान, मनोरंजन, विकास ही चार प्रमुख क्षेत्रे आहेत जी कोणत्याही राष्ट्राचे भविष्य उज्ज्वल करतात. रामोजी ग्रुपच्या सर्व कंपन्या याच चार स्तंभांवर उभ्या राहून सतत सार्वजनिक सेवेत सहभागी होतात. त्यावर नेहमीच जनतेचा विश्वास अबाधित राहिलेला आहे.

रामोजी राव
ईटीव्ही भारत अ‍ॅप लाँच करताना रामोजी राव (ईटीव्ही भारत, संग्रहित छायाचित्र)

'ईनाडूचा धगधगता पत्रकारितेतील विजयी प्रवास; 'उषोदय' आणि इतर प्रकाशनांची उपयुक्तता जगभर आहे. राज्याच्या सीमा ओलांडून पसरलेली 'मार्गदर्शी' कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी अक्षरशः सोने आहे. 'ईटीव्ही' आणि 'ईटीव्ही भारत' नेटवर्क हेच आमचं बलस्थान आहे, जे देशभर पसरलं आहे. 'तेलुगु फ्लेवर्स'ची ॲम्बेसेडर म्हणून 'प्रिया'चं स्थान भक्कम आहे. रामोजी फिल्म सिटी ही देशाची शान आहे.

या सर्वांमध्ये, सर्वच गोष्टींच्या यशामध्ये तू (कर्मचारी) माझी सेना आहेस. 'रामोजी' हे शिस्तीचे प्रतिनाम आहे! तुमची नाळ कर्मचारी म्हणून संस्थेशी जोडली जाते. नोकरी आणि तुमच्या आयुष्याची प्रगती होत राहील. सर्जनशील शक्तीने येणाऱ्या आव्हानांवर मात करा. रामोजी ग्रुपचा दिग्विजयी प्रवास न थांबणारा आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने सक्षम आणि वचनबद्ध सैनिक म्हणून वाटचाल करत राहावे!

रामोजी ग्रुप ऑफ कंपनीज हा अटल विश्वासाची निशाणी आहे. मी जबाबदारीचं इच्छापत्र लिहिलय, त्यावर मार्गक्रमण करण्याचं आवाहन तुम्हाला करतो!"

हेही वाचा...

रामोजी रावांनी मृत्यूपूर्वीच बांधलं होतं स्वत:चं स्मारक!

रामोजी रावांच्या आयुष्यातील सोनेरी क्षण, कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो पाहा....

रामोजी फिल्म सिटी एक जादुई ठिकाण! जिथं स्वप्नं सत्यात उतरतात

फिल्मी दुनियेत रामोजी रावांचाच दबदबा; 'ईटीव्ही मराठी'च्या माध्यमातून दिल्या सुपरहिट मालिका

Last Updated : Jun 10, 2024, 9:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.