ETV Bharat / entertainment

अनंत अंबानी, राधिका मर्चंट यांनी लग्न विधी सुरू होण्यापूर्वी केली 'अन्न सेवा'

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 2:38 PM IST

उद्योजक अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटशी लग्नगाठ बांधणार आहेत. या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या उत्सवाची सुरुवात अन्न सेवेने केली.

Anant Ambani, Radhika Merchant
अनंत अंबानी, राधिका मर्चंट

मुंबई - मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच उद्योगपती वीरेन मर्चंट आणि उद्योजक शैला मर्चंट यांची धाकटी मुलगी राधिका मर्चंटशी लग्न बंधनात अडकणार आहे. गुजरात मधील जामनगर, येथे 1 मार्च ते 3 मार्च या कालावधीत विवाहपूर्व विधी पार पडणार आहेत. या भव्य इव्हेंटमधील अनेक अपडेट्स आणि व्हिडिओने इंटरनेट व्यापून गेले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचेचेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट हिच्याशी लग्न करणार आहे. याच्या लग्नापूर्वीच्या उत्सवाची सुरुवात 'अन्न सेवा'ने झाली. राधिका मर्चंटसह मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि अंबानी कुटुंबातील इतर सदस्यांनी जामनगरमधील रिलायन्स टाउनशिपजवळील जोगवाड गावातील रहिवाशांना पारंपारिक गुजराती जेवण दिले. राधिकाची आजी आणि आई-वडील वीरेन आणि शैला मर्चंट यांनीही 'अन्न सेवे'मध्ये भाग घेतला. पुढील काही दिवसांत सुमारे 51,000 स्थानिक रहिवाशांना अन्न वाटप केले जाणार आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या विधी सोहळ्यासाठी स्थानिक समुदायाचा आशीर्वाद घेण्यासाठी अंबानी कुटुंबाने 'अन्न सेवा' आयोजित केली होती. जेवणानंतर पाहुण्यांना पारंपरिक लोकसंगीताची ओळख करून देण्यात आली. सुप्रसिद्ध गुजराती गायक कीर्तिदान गढवी यांनी आपल्या गायनाने या कार्यक्रमात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

जेवणावळी उठवणे ही अंबानी कुटुंबाची जुनी परंपरा आहे. यानुसार अंबानी कुटुंबाने पारंपारिकपणे शुभ कौटुंबिक प्रसंगी जेवण दिले आहे. जेव्हा देश कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराचा सामना करत होता, तेव्हा अनंत अंबानींच्या आई नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स फाऊंडेशनने अन्न वितरणाचा एक मोठा प्रकल्प राबवला होता. कौटुंबिक परंपरा पुढे चालू ठेवत अनंत अंबानी यांनी त्यांच्या लग्नाआधीच्या कार्याची सुरुवात अन्न सेवेने केली.

विवाहपूर्व उत्सव पारंपारिक आणि भव्य असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विवाहपूर्व उत्सवादरम्यान पाहुण्यांना भारतीय संस्कृतीच्या वैभवाचा आनंद घेता येणार आहे. पाहुण्यांना गुजरातमधील कच्छ आणि लालपूर येथील महिला कारागिरांनी बनवलेले पारंपरिक स्कार्फही देण्यात येणार आहेत.

हेही वाचा -

  1. "हिरामंडी माझा सर्वात मोठा प्रोजेक्ट पाहून मीही झालो आश्चर्यचकित" : संजय लीला भन्साळी
  2. 'प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा' : स्वतःचंच नाव सांगणाऱ्या खलनायकाच्या प्रभावाची 65 वर्षे
  3. सलमानने आपले पेटिंग्ज चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आर्टफी कंपनीशी केला करार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.