ETV Bharat / bharat

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 60 व्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस नेत्यांसह पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली - Nehru Death Anniversary

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 11:24 AM IST

Congress pays tribute to former PM Jawaharlal Nehru : माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज (27 मे) 60 वी पुण्यतिथी आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शांतीवन येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. तर पंतप्रधान मोदींनी एक्स मीडियावर पोस्ट केली.

PM Jawaharlal Nehru death anniversary
पंडित जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी (Source ETV Bharat)

नवी दिल्ली Congress pays tribute to former PM Jawaharlal Nehru : काँग्रेस नेत्यांनी सोमवारी (27 मे) माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या 60 व्या पुण्यतिथीनिमित्त शांती वन, नवी दिल्ली येथील त्यांच्या स्मृतीस्थळी आदरांजली वाहिली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राज्यसभा खासदार अजय माकन आदी उपस्थित होते.

मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले? : जवाहरलाल नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात खरगे यांनी म्हटले की, "आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अतुलनीय योगदानाशिवाय भारताचा इतिहास अपूर्ण आहे. त्यांनी भारताला वैज्ञानिक, आर्थिक, औद्योगिक आणि विविध क्षेत्रात पुढं नेलं. लोकशाहीचे समर्पित संरक्षक, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान हे आमचे प्रेरणा स्रोत आहेत."

एकता हा आपल्या सर्वांचा राष्ट्रधर्म- पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, " देशाचं रक्षण, देशाची प्रगती, देशाची एकता हा आपल्या सर्वांचा राष्ट्रधर्म आहे. आपण वेगवेगळ्या धर्मांचं पालन करतो. वेगवेगळ्या राज्यांत राहतो. वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो. परंतु यामुळं आपल्यामध्ये कोणतीही भिंत निर्माण होऊ नये. देशाच्या प्रगतीत सर्वांचा समान वाटा आहे. आपल्या देशातील काही लोक खूप श्रीमंत आणि बहुतेक लोक गरीब असावेत, असं आपल्याला वाटत नाही. आजही काँग्रेस पक्ष त्याच ‘न्याय’ मार्गावर चालत आहे, " असे काँग्रेस अध्यक्षांनी आवर्जून नमूद केलं.

16 वर्षांहून अधिक काळ पंतप्रधान- पुढं ते म्हणाले की, "जवाहरलाल नेहरू हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली आणि 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर ते भारताचे पहिले पंतप्रधान झाले." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केलं.

दरम्यान, नेहरूंनी हे पद 16 वर्षांहून अधिक काळ सांभाळलं. 27 मे 1964 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. त्यांच्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांनी भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. नेहरूंना भारताच्या Non-Aligned Movement (NAM) चे प्रणेते मानले जाते. मुलांवरील प्रेमामुळं त्यांना 'चाचा नेहरू' असंही संबोधलं जातं. तसंच 14 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस भारतात दरवर्षी 'बालदिन' म्हणून साजरा केला जातो.

हेही वाचा -

  1. Pandit Nehru Birth Anniversary : पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती; पाहा त्यांच्या आयुष्यातील दुर्मीळ फोटो
  2. Chandrayaan-3 : जवाहरलाल नेहरूंच्या सुरुवातीच्या प्रयत्नांमुळे शक्य: चंद्रयान मोहिमेवर काँग्रेसची प्रतिक्रिया
  3. भारतीय संविधान सभेच्या भाषणात पंडित नेहरूंनंतर डॉ. पंजाबराव देशमुख यांनी वापरलेत सर्वाधिक शब्द
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.