ETV Bharat / bharat

Chandrayaan-3 : जवाहरलाल नेहरूंच्या सुरुवातीच्या प्रयत्नांमुळे शक्य: चंद्रयान मोहिमेवर काँग्रेसची प्रतिक्रिया

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 8:18 AM IST

चंद्रावर यान पाठवणाऱ्या देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकाचा देश बनलाय.आतापर्यंत अमेरिका, चीन, रशिया या देशांनी चंद्रावर यान पाठवलेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान पाठवणारा भारत हा पहिला देश ठरलाय. भारताची चंद्रयान -3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने प्रतिक्रिया दिलीय.

चंद्रयान मोहिमेवर काँग्रेसची प्रतिक्रिया
चंद्रयान मोहिमेवर काँग्रेसची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : चंद्रयान -3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचं जगभरात कौतुक केलं जातंय. काँग्रेस पक्षानेदेखील इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलंय. परंतु चंद्रयान-3 चं यश हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे मिळाल्याचं काँग्रेसनं म्हटलयं. नेहरूंनी सुरुवातीला केलेल्या प्रयत्नांमुळे आज आपण चंद्रयान-3 चं यश पाहू शकत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस पक्षानं दिलीय.

काँग्रेसनं काय म्हटलं : चंद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारत अमेरिका, चीन, रशिया यांच्या पंगतीत जाऊन बसलाय. दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-3 च्या मोहिमेतून संशोधन केले जाणार आहे. भारताचा चंद्रापर्यंतचा प्रवास एक दृढनिश्चयाची आणि दूरदृष्टीची कहाणी सांगणारा आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाने आणि दूरदृष्टीने भारतीय अवकाश संशोधनाचा पाया घातला गेला. यामुळे आपण जे आज चांद्रयान-3 चे यश पाहत आहोत. ते नेहरूंच्या सुरुवातीच्या प्रयत्नांचा परिणाम आहे, असं काँग्रेस पक्षानं X (आधीचे ट्विटर) या सोशल मीडियावर साईटवर लिहिलंय. काँग्रेसनं म्हटलं की, हे प्रत्येक भारतीयांचे सामूहिक यश आहे. इस्रोचं हे यश विलक्षण आहे.

  • India's voyage to the moon and beyond is a tale of pride, determination & vision.

    It was independent India’s first Prime Minister, Jawaharlal Nehru, whose scientific outlook and vision laid the foundation of Indian space research.

    Today, the success of Chandrayaan-III is a… pic.twitter.com/Uc1PiIIesl

    — Congress (@INCIndia) August 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

140 कोटी जनतेच्या राष्ट्रानं 6 दशकांच्या अंतराळ कार्यक्रमात नवे यश मिळवले. संपूर्ण जग भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडे (इस्रो) पाहत आहे. त्यांचे कौतुक करत आहे. ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. - काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे

आम्ही आमचे शास्त्रज्ञ,अंतराळ अभियंता, संशोधकांची अतुलनीय कल्पकता, निष्ठा आणि उल्लेखनीय परिश्रमाचे मनापासून ऋणी आहोत. चंद्रयान-3 मोहिमेत भारताला यश मिळवून देण्यात या सर्वांचा सहभाग आहे. शास्त्रज्ञ, अंतराळ अभियंता या सर्वांच्या उल्लेखनीय परिश्रमामुळे हे यश मिळालं असल्याचेही मलिक्कार्जुन खरगे म्हणाले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनीही इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलंय. 1962 पासून भारताच्या अंतराळ कार्यक्रमाने नवनवीन उंची गाठणं सुरू ठेवलयं. यामुळे स्वप्न पाहणाऱ्या पुढच्या पिढ्यातील तरुणांना प्रेरणा मिळते, असेही राहुल गांधी म्हणाले.

  • Congratulations to Team ISRO for today's pioneering feat.#Chandrayaan3’s soft landing on the uncharted lunar South Pole is the result of decades of tremendous ingenuity and hard work by our scientific community.

    Since 1962, India’s space program has continued to scale new…

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) August 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आजच्या या अग्रगण्य पराक्रमासाठी टीम इस्रोचे अभिनंदन. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान 3 चे सॉफ्ट लँडिंग करणं, हे आपल्या वैज्ञानिकांच्या अनेक दशकांच्या प्रचंड कल्पकतेचं आणि त्यांच्या कठोर परिश्रमाचं हे परिणाम आहेत. - राहुल गांधी , काँग्रेस खासदार

हेही वाचा-

  1. भारताची 'चंद्रक्रांती'! Chandrayaan 3 चे चंद्रावर यशस्वी लॅंडिग
  2. चंदा मामा दूरचे नसून आता चंदा मामा टूरचे, देशभरात एकच जल्लोष
  3. चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर पुढील 14 दिवस का महत्त्वाचे?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.