ETV Bharat / state

सोयाबीनचे उत्पादन कमी अन् कुटारच जास्त; शेतकरी हवालदिल

author img

By

Published : Oct 12, 2020, 3:56 PM IST

Updated : Oct 12, 2020, 5:26 PM IST

सोयाबीन पीक
सोयाबीन पीक

सोयबीनच्या बोगस बिया, दुबार पेरणी आणि आता पाऊस यामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

यवतमाळ - जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ऐन सोयाबीन काढणीच्यावेळी पाऊस झाल्याने सोयाबीन कमी कुटार जास्त निघाले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून लागवडीचा खर्चही निघणे अवघड झाल्याचे चित्र पहायला मिळत आहेत.

बोलताना शेतकरी

घाटंजी तालुक्यातील कोपरी गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनला शेंगाच लागल्या नाही. ज्या झाडाला शेंगा लागल्या त्यात दानेच लागले नसल्याने कोपरी गावातील शेतकरी संकटात सापडले आहे. कोपरी गावातील एका शेतकऱ्याने त्यांच्या चार एकर शेतात त्यांनी जून महिन्यात सोयाबीनची लागवड केली होती. मात्र, आता त्यांच्या शेतात केवळ 50 किलो सोयाबीन झाले आहे. बियाणे, खत, फवारणी, योग्य काळजी घेतली. मात्र, सोयाबीन वाळलेल्या काड्या शेतात राहिल्या आहेत. यात त्यांचा लागवड खर्चही निघणार नाही, अशी अवस्था झाली आहे. आता पुढे कुटुंब कस चालवायचे याचा प्रश्न त्यांना पडला आहे.

सोयाबीनची काढणी केली तर हारव्हेस्टर चालकाला देण्याएवढे सोयाबीन निघत नाही. अशात पुढे काय आणि कसे करायचे असा, प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सरकारने बोगस बियाणे बाजारात येणार नाही यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच सध्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

हेही वाचा - यवतमाळ : कोरोना मृत्यूचे सत्र पुन्हा सुरू; शुक्रवारी चार जणांचा मृत्यू

Last Updated :Oct 12, 2020, 5:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.