ETV Bharat / state

महागाईमुळं दहा रुपयांत जेवण देणं परवडेना; शिवभोजन थाळी बंद होण्याच्या मार्गावर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 5:26 PM IST

Shiv Bhojan Thali : गोरगरिबांच्या खिशाला परवडेल असं सकस अन्न मिळावं यासाठी महाविकास आघाडी सरकारनं राज्यभर शिवभोजन थाळी ही योजना सुरू केली. अगदी १० रुपयात संपूर्ण आहार मिळाल्याने गोरगरीब कष्टकरी देखील खुश झाले. परंतु ही थाळी आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कारण वाढत्या महागाईमुळे केंद्र चालकांना अवघ्या दहा रुपयात ही थाळी देणं परवडत नाही.

Shiv Bhojan Thali
शिवभोजन थाळी

शिवभोजन थाळी योजना परवडेना

ठाणे Shiv Bhojan Thali : तीन वर्षांपूर्वी सुरू झालेली शिवभोजन योजना आणि त्याकाळी असलेली महागाई आणि आताच्या महागाईमुळे कडधान्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. अशाच अनेक वर्षापूर्वी राज्यात सेना भाजपा युतीच्या काळात अवघ्या १ रुपयात झुणका भाकर केंद्र सुरू (Jhunka Bhakar) झाली आणि गोरगरिबांना पोटभर अन्न मिळू लागले होते. कालांतराने ही केंद्रे महागाईमुळे बंद होऊन केंद्र चालकांनी याच झुणका भाकर केंद्रात इतर व्यवसाय सुरू केले. कोरोनाच्या आधी पुन्हा एकदा राज्य सरकारतर्फे १० रुपयात शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली. सध्या जिथे साधा वडापाव देखील १५ ते २० रुपयात मिळतो तिथे केवळ दहा रुपयात दोन चपात्या, वरण-भात भाजी असा संपूर्ण आहार मिळू लागल्याने, गोरगरिबांच्या भुकेल्या पोटाला आधार मिळाला.

सबसिडी वाढवून द्यावी : राज्य सरकारने बांधकाम प्रकल्पवरील मध्यान्ह भोजन योजना १ नोव्हेंबरपासून बंद केल्याने, हे कामगार देखील याच योजनेचा लाभ घेतात. दररोज शेकडो गोरगरीब कष्टकरी या केंद्रांवर आपली भूक भागवतात. त्यासोबतच ज्यांच्या घरी डबा करणारे कोणी नाहीत अशी मंडळी देखील या योजनेचा लाभ घेतात. या थाळीचे मूळ मूल्य ५० रुपये असून राज्य सरकार तर्फे ४० रुपये सबसिडी देण्यात येते. त्यामुळे केंद्र चालकांना थाळी मागे ५० रुपये मिळतात. परंतु वाढलेल्या महागाईने आता ही थाळी या दरात देणे परवडत नसल्याचं, केंद्र चालकांनी सांगितलं. सध्या जेवण बनविण्यास अत्यावश्यक असणारे कांदा, लसूण, टोमॅटो, डाळी तसंच इतर भाज्यांचे भाव कडाडले आहेत. ही केंद्रे देखील झुणका भाकर केंद्रांप्रमाणे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ही केंद्रे जर बंद पडली तर येथे दरदिवशी जेवणाऱ्या कष्टकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळं सबसिडी वाढवून द्यावी अशी मागणी केंद्रचालकांनी केली आहे.



दर वाढणारे पण अनुदान नाही : तीन वर्षांपूर्वी सुरू झालेली ही योजना आणि आता त्याचे मिळणारे अनुदान हे सारखेच आहे. अनुदानामध्ये वाढ झालेली नाही. मात्र महागाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. गॅसच्या किंमती, विजेचे दर, कडधान्य, तेल सर्वच गोष्टी महागल्या आहेत. त्यामुळं आता अनुदान कमी पडत असल्याचं शिवभोजन थाळी चालक सांगतात.


इतर व्यवसाय करता येणार नाही : या केंद्र चालकांना सरकारने नियम घालून दिले आहेत. ज्यामध्ये या शिवभोजन थाळी व्यतिरिक्त त्यांना कोणताही व्यवसाय करता येणार नाही. त्यांना इतर अन्न पदार्थ देखील केंद्रात ठेवता येणार नाही आणि मग दिवसातील एक वेळच थाळी देवून हा व्यवसाय बंद करावा लागतो. त्यामुळं खर्च वाढून उत्पन्न मिळत नसल्याचं केंद्र चालक सांगतात. मात्र 10 रुपयात जेवण मिळत असल्यानं नागरिकांना मात्र हे परवडत आहेत.


हेही वाचा -

  1. Shiv Bhojan Kendra Nashik : अनुदान नसल्याने सोने गहाण ठेऊन शिवभोजन केंद्र सुरू; बचतगट महिला अडचणीत
  2. Shiv Bhojan thali : आघाडीची शिवभोजन थाळी नियमांच्या कचाट्यात
  3. NCP On Shivbhojan Thali : शिवभोजन थाळी बंद केल्यास आंदोलन करणार, राष्ट्रवादीचा इशारा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.