ETV Bharat / state

पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार, खासदार श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 7:05 PM IST

MP Shrikant Shinde: पालघर लोकसभा मतदारसंघ (Palghar Lok Sabha) शिवसेनेचा आहे. येथील खासदार राजेंद्र गावित शिवसेनेचे असून, तेच धनुष्यबाणाच्या चिन्हावर मोठ्या फरकानं निवडून येतील, (MP Rajendra Gavit) असा दावा कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. हा मतदारसंघ भाजपाला जाण्याच्या वृत्तात काहीही तथ्य नाही. उद्धव ठाकरे यांच्या काळातील गैरव्यवहार लवकरच बाहेर येईल. आम्ही जनतेसोबत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (Lok Sabha Election 2024)

MP Shrikant Shinde
खासदार श्रीकांत शिंदे

पालघर येथील कार्यक्रमात मीडियाशी बोलताना श्रीकांत शिंदे

पालघर MP Shrikant Shinde : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेना पक्षाची पालघर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी पालघर, बोईसर आणि डहाणू विधान सभानिहाय मेळावे घेतले. (Uddhav Thackeray) या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्रीकांत शिंदे आले होते. यावेळी समन्वयक आणि मुख्य प्रवक्ते नरेश म्हस्के, संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, पालघर लोकसभा निरीक्षक पांडुरंग पाटील उपस्थित होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून टीका केली. ते म्हणाले की, त्यांच्या सरकारच्या काळात जनतेला घरात कोंडून ठेवलं. मेट्रोसह अन्य कामे रेंगाळली. कोरोना काळात खरेदी करण्यात आलेल्या साहित्य खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. या खरेदीतील प्रत्येक गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित होईल.

'ते' वृत्त साफ खोटं: पालघर मतदारसंघ भाजपाला सोडण्यात येणार असल्याचं वृत्त फेटाळून खासदार शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एखाद्या जिल्ह्यातील दौरा रद्द होण्याचा विपरीत अर्थ कोणीही काढू नये. मुख्यमंत्री असल्यानं त्यांना अनेक कामं असतात. अचानक काही तातडीची कामं निघू शकतात. त्यामुळे दौरा रद्द करावा लागतो. पुन्हा दौरा जाहीर होऊ शकतो. मुख्यमंत्री आले नाहीत, म्हणून हा मतदारसंघ भाजपाला गेला असा अर्थ काढू नका. वाढवण बंदराबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले की, या बंदराबाबत अनेक मतंमतांतरं आहेत. तज्ज्ञांसोबत चर्चा केली जाईल. शंकाचं निरसन करून जनतेच्या हिताचा निर्णय घेतला जाईल.

मेळावे घेऊन पक्षबांधणी करू: शिवसंकल्प यात्रेचा उद्देश स्पष्ट करताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, तळागाळातपर्यंत संघटनात्मक बांधणी करण्यावर भर दिला आहे. तालुका आणि विधानसभा निहाय मेळावे घेऊन पक्ष बांधणी केली जाईल. यावेळी खासदार राजेंद्र गावीत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, आमदार श्रीनिवास वणगा, आमदार शांताराम मोरे, शिवसेना आदिवासी समाज महाराष्ट्राचे संघटक जगदीश धोड़ी, शिवसेना उपनेते राजेश शहा, जिल्हाप्रमुख कुंदन संखे, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा:

  1. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; अपात्रतेच्या निकालाआधीच मोठी खलबतं?
  2. 'राहुल नार्वेकरांना आदेश देण्याचे सुप्रीम कोर्टाला अधिकारच नाहीत'
  3. चिथावणीखोर भाषण भोवलं; आमदार नितेश राणे आणि टी राजा सिंह यांच्यावर सोलापुरात गुन्हा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.