ETV Bharat / state

Climate Change : निसर्गातील बदलामुळे हवामानात बदल होत राहणार - हवामान तज्ञ पंजाबराव डक

author img

By

Published : Mar 20, 2022, 5:11 PM IST

निसर्ग बदलत असून, हवामान देखील सतत बदलत ( Climate Will Change As Nature Changes ) असल्यामुळे त्यानुसार शेती करणे गरजेचे आहे. 21, 22, 23 मार्च पर्यंत राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे, अशी माहिती हवामान तज्ञ पंजाबराव डक ( Meteorologist Punjabrao Duck ) यांनी दिली आहे.

Meteorologist Punjabrao Duck
Meteorologist Punjabrao Duck

येवला ( नाशिक ) - निसर्ग बदलत असून, हवामान देखील सतत बदलत ( Climate Will Change As Nature Changes ) असल्यामुळे त्यानुसार शेती करणे गरजेचे आहे. 21, 22, 23 मार्च पर्यंत राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये रात्री बारीक रिमझिम पावसाची शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव डक ( Meteorologist Punjabrao Duck ) यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्याख्यान झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पंजाबराव डक म्हणाले की, पृथ्वीचे तापमान वाढत राहिल्यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टीला सामना करावा लागला. तापमान कमी करण्यासाठी झाडे लावावे लागतील, त्यासाठी सर्वांनी हातभार लावावा लागले. यंदा उन्हाळ्यात तापमान 44 ते 45 अंशापर्यंत जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

हवामान तज्ञ पंजाबराव डक प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

यावर्षी समाधानकारक पाऊस

पाऊसासंदर्भात बोलताना डक यांनी सांगितले, पूर्वेकडून महाराष्ट्रात पाऊस झाला की सर्वात जास्त पाऊस विदर्भ, मराठवाड्यात होतो. तसेच, खटाव तालुक्यात दरवर्षी दुष्काळ असतो. मात्र, पूर्वेकडून पाऊस आला की खटाव तालुक्यातही पाऊस पडतो. या वर्षी होणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी समाधानकारक असेल. जून आणि जुलै मध्ये शेतकऱ्यांची पेरणी होईल. सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस असेल. तर 28 ऑक्टोंबरला राज्यात थंडीला सुरुवात होईल, अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे.

हेही वाचा - येत्या काही दिवसात महाराष्ट्राचा दौरा करणार, भाजपाचे हिंदुत्व केवळ राजकारणासाठी - मुख्यमंत्री ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.