ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : विराट कोहलीच्या ब्रेक घेण्याच्या चर्चेनंतर सुनील गावस्करांनी दिला सल्ला; म्हणाले...

author img

By

Published : May 8, 2022, 10:30 PM IST

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची ( Indian star batsman Virat Kohli ) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. काही दिवसापासून अनेक दिग्गज खेळाडू त्याला काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला देत असताना, यावर आता सुनील गावस्कर ( Former veteran Sunil Gavaskar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Virat Kohli
Virat Kohli

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची ( Indian star batsman Virat Kohli ) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. या मोसमात कोहली शून्यावर बाद होण्याची ही तिसरी वेळ होती. कोहलीच्या खराब फॉर्मनंतर अनेक क्रिकेट दिग्गजांनी त्याला क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यावर आता माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर ( Former veteran Sunil Gavaskar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी प्रतिक्रिया ( Sunil Gavaskar Reaction ) देताना आपले मत मांडले आहे. त्यांच्या मते कोहलीने कोणत्याही परिस्थितीत मैदान सोडू नये. माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर कॉमेंट्री करताना म्हणाले. जोपर्यंत ब्रेक्सचा संबंध आहे, कोहली भारताचे सामने गमावत नाही. भारताचे सामने हे पहिले प्राधान्य असायला हवे. माझ्या मते, तुम्ही खेळला नाही, तर तुझा फॉर्म कसा परत येणार आहे. चेंज रूममध्ये बसून तुमचा फॉर्म परत मिळणार नाही. तुम्ही जितके जास्त क्रिकेट खेळता तितके तुम्हाला फॉर्ममध्ये येण्याची शक्यता जास्त असते.

कोहलीने या मोसमात 12 सामन्यांत 19.64 च्या निराशाजनक सरासरीने केवळ 216 धावा केल्या आहेत. या मोसमात त्याच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक झळकले आहे आणि त्या डावातही त्याने संथ फलंदाजी केली. कोहलीने या हंगामात 111.34 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत आणि ते देखील त्याच्या उंचीला शोभत नाही.

कोहलीचा या पद्धतीने सततचा संघर्ष जवळपास प्रत्येक क्रिकेट चाहत्याला दुखावत आहे. कोहलीने गेल्या काही वर्षांत सातत्य राखून इतक्या धावा केल्या आहेत की, तो आधुनिक क्रिकेटचा दिग्गज बनला ( Veteran of modern cricket ) आहे. या वर्षाच्या अखेरीस टी-20 विश्वचषक होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रत्येक समर्थकाला आशा आहे की, या मेगा स्पर्धेपूर्वी कोहलीने गमावलेला फॉर्म परत मिळवावा.

हेही वाचा - Ipl 2022 Rcb Vs Srh : आरसीबीचा एसआरएचवर 67 धावांनी मोठा विजय; हैदराबादच्या राहुल त्रिपाठीची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.