पुणे - जी लोकशाही आपण स्वीकारली त्यात बरखास्तीचे नियम ठरलेले आहेत. तुमच्या आमच्या हातात बरखास्तीची मागणी करणे आहे. ही मागणी तर आम्ही अनेक वेळा करत आहोत. 100 असे प्रसंग मी काढलेले आहेत, की ज्या प्रसंगात बरखास्तीशिवाय (State Government will Dismissed) कायद्याने काहीच असू शकत नाही, असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर ते बोलत होते.
या सरकारने सर्वसामान्य माणसाच्या जीवाशी खेळायचं ठरवलंय -
आधी आरोग्य भरतीच्या परीक्षा पेपरफुटी आणि मग म्हाडा पेपरफुटी प्रकरण आणि आज टीईटी परीक्षेत देखील पेपरफुटी प्रकरणात परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना आज अटक करण्यात आली आहे. या तिन्ही पेपरफुटी संदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारलं असतां ते म्हणाले की या सरकारने सर्वसामान्य माणसाच्या जीवाशी खेळायचं ठरवलं आहे. मग ते एसटी संप असू दे किंवा विविध विभागातील परीक्षा असू दे. एमपीएससीचा तर सत्यानाश करून टाकला आहे. हे सरकार लोकांच्या जीवाशी खेळत आहे. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांची मानसिकता काय होत असेल ते सरकारला दिसत नाही. यांचेच हात बरबटलेले असल्याने चौकशी समिती नेमून काय होणार आहे, असं यावेळी पाटील म्हणाले.
100 असे प्रसंग आहेत की ज्यात महाआघाडी सरकार कायद्याने बरखास्त होईल - चंद्रकांत पाटील
पुणे - जी लोकशाही आपण स्वीकारली त्यात बरखास्तीचे नियम ठरलेले आहेत. तुमच्या आमच्या हातात बरखास्तीची मागणी करणे आहे. ही मागणी तर आम्ही अनेक वेळा करत आहोत. 100 असे प्रसंग मी काढलेले आहेत, की ज्या प्रसंगात बरखास्तीशिवाय (State Government will Dismissed) कायद्याने काहीच असू शकत नाही, असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर ते बोलत होते.
या सरकारने सर्वसामान्य माणसाच्या जीवाशी खेळायचं ठरवलंय -
आधी आरोग्य भरतीच्या परीक्षा पेपरफुटी आणि मग म्हाडा पेपरफुटी प्रकरण आणि आज टीईटी परीक्षेत देखील पेपरफुटी प्रकरणात परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना आज अटक करण्यात आली आहे. या तिन्ही पेपरफुटी संदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारलं असतां ते म्हणाले की या सरकारने सर्वसामान्य माणसाच्या जीवाशी खेळायचं ठरवलं आहे. मग ते एसटी संप असू दे किंवा विविध विभागातील परीक्षा असू दे. एमपीएससीचा तर सत्यानाश करून टाकला आहे. हे सरकार लोकांच्या जीवाशी खेळत आहे. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांची मानसिकता काय होत असेल ते सरकारला दिसत नाही. यांचेच हात बरबटलेले असल्याने चौकशी समिती नेमून काय होणार आहे, असं यावेळी पाटील म्हणाले.