ETV Bharat / city

अनिल देशमुख दोषी आहे म्हणूनच त्यांना जामीन नाही - चंद्रकांत पाटील

author img

By

Published : Nov 6, 2021, 7:25 PM IST

Chandrakant patil
चंद्रकांत पाटील

नगरची घटना जशी दुर्दैवी आहे तसा विरोधी पक्षाचा नेता म्हणून ती कोणी घडवली आहे असं मी म्हणणार नाही. दुर्दैवी घटना घडवणे इतकं महाराष्ट्राचं कल्चर खाली गेले नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुणे :- वारंवार शाहरुख खानच्या मुलाचं विषय असू दे किंवा अनिल देशमुख यांचा विषय असू दे. सदासर्वकाळ तुम्ही भाजपवर टीका करत असतात न्यायालयही देखील भाजपमध्ये सामील झालं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का .. न्यायालय जेव्हा 24 दिवस शाहरुख खानच्या मुलाला जमीन देत नाही त्याच पद्धतीने अनिल देशमुख यांना जामीन देत नाही. याचा अर्थ असा की केसमध्ये काहीतरी दम आहे. इतक्या उच्च स्तरीय नेत्याच्या बाबतीत न्यायालय खूप फुंकून फुंकून पिते. अनिल देशमुख दोषी आहे म्हणुनच त्यांचा जामीन झालेला नाही.चौकशी समितीने चौकशी करून शिक्षा दिली पाहिजे तरच सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास बसेल असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

अनिल देशमुख दोषी आहे म्हणूनच त्यांना जामीन नाही
घटनेचा चौकशी अहवाल सगळ्यांना कळाला पाहिजे
नगरची घटना जशी दुर्दैवी आहे तसा विरोधी पक्षाचा नेता म्हणून ती कोणी घडवली आहे असं मी म्हणणार नाही. दुर्दैवी घटना घडवणे इतकं महाराष्ट्राचं कल्चर खाली गेलेला नाही. पण घटना घडल्यानंतर दोन ते तीन दिवस त्याची खूप चर्चा होते. पण नंतर तो विषय कुठं गायब होतो कळतच नाही. नाशिक, मुंबईची या घटनानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्या समितीचा निष्कर्ष काय निघाला. त्या निष्कर्षाच्या आधारे काही काम करणार आहेत का नाही. ते काम करण्याचा काही टाईमबॉम्ब रिपोर्ट मिळणार आहे का नाही. नगरच्या घटनेत सगळ्यांनी मदत कार्य केले पाहिजे. पण या आगीच्या घटनेची जी चौकशी कराल त्याचा रिपोर्ट लोकांपर्यंत कळलं पाहिजे की का आग लागली होती. आणि कोणामुळे घडली आहे हे कळाल पाहिजे आणि यानंतरच ते रुग्णालय सुरू करण्यात यावं, असेही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
भाजपा हा विषय लावून धरणार आहोत
ही घटना घडल्यानंतर दोन ते तीन दिवस त्या घटनेवर खूप चर्चा केली जाते. विरोधी पक्ष म्हणून आम्ही देखील सरकारला जाब प्रश्न विचारतो. पण एक ते दोन दिवसानंतर शांत होतो. नगरच्या घटनेत आम्ही शांत बसणार नाही. ही काही मानवनिर्मित घटना नाही. नेमकं काय झालं आहे. दिवाळीत 11 जणांचे जीव गेले आहेत. आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून हा विषय लावून धरणार आहोत. जी मदत लागेल ती मदत करायला आम्ही तयार आहोत. पण आगीचा कारण काय यासाठी आम्ही शांत बसणार नाही असं देखील यावेळी पाटील म्हणाले.

हेही वाचा - दिल्ली SITची टीम मुंबईत दाखल; आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह 'या' सहा प्रकरणाचा करणार तपास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.