ETV Bharat / city

Vinayak Raut on Shinde Government : शिंदे गटाचे बारा आमदार आमच्या संपर्कात - शिवसेना नेते विनायक राऊत

author img

By

Published : Aug 9, 2022, 11:25 AM IST

Shiv Sena Leader Vinayak Raut
खासदार विनायक राऊत

महाराष्ट्रात शिंदे गट ( Shinde Group ) आणि भाजप ( BJP ) यांनी सरकार स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्र्यांचा ( Chief Minister Shinde ) शपथविधी होऊन तब्बल एक महिना झाला. तरीही मंत्रिमंडळाच्या विस्ताराला ( Expansion of Cabinet ) आता मुहूर्त लागला आहे. यावर शिवसेना नेते विनायक राऊत म्हणाले की, यातील 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत. हे औटघटकेचे सरकार आहे.

मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर ( After Rebellion in Shiv Sena ) शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार तब्बल महिनाभराने होत आहे. मुख्यमंत्री शिंदे ( Chief Minister Shinde ) यांच्यासोबत गेलेले अनेकजण मंत्रिपदासाठी ( Expansion of Cabinet ) इच्छुक आहेत. त्यापैकी १२ जण अस्वस्थ असून, ते आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते विनायक राऊत ( Shiv Sena leader Vinayak Raut ) यांनी केला. तसेच, हे औटघटकेचे सरकार आहे, अशी टीका केली.


मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मिळाला मुहूर्त : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत नेले. सुरतमध्ये जाऊन पक्षविरोधात बंड पुकारला. राज्यातील मविआचे सरकार अल्पमतात आल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंदे यांनी भाजपच्या सोबतीने राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ३० जूनला शपथ घेतली. सरकारचा त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार लांबला. विरोधकांनी यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर कोटी करायला सुरुवात केली. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय सरकारने घेतला आहे.


१२ आमदार संपर्कात : अनेक बंडखोर आमदार मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी इच्छुक आहेत. मुख्यमंत्री शिंदेंवर यासाठी दबाव सुरू आहे. काही जण शिंदे गटात अस्वस्थ आहेत. त्यात मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले अब्दुल सत्तार आणि इतर आमदार एकमेकांच्या उरावर बसायला सुरुवात करतील आणि शिंदे फडणवीसांचे मंत्रिमंडळ औटघटकाचे ठरेल, असे विधान विनायक राऊत यांनी केले. तसेच शिंदे गटात गेलेले १२ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला.


मुंबईत या फर्मान : भाजपकडून नऊ ते बारा जणांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, अतुल सावे, गणेश नाईक, विजयकुमार गावित यांना मुंबईत येण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, उदय सामंत, संजय शिरसाट, दादा भुसे, भरत गोगावले यांच्या नावाचा समावेश आहे. या सर्वांना तातडीने मुंबईत येण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा : On Occasion World Tribal Day : आदिवासी दिनीच 'या' आदिवासी पाड्यातील नागरी सुविधांचे भयाण वास्तव समोर....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.