ETV Bharat / city

Sanjay Raut : संजय राऊत पुन्हा टार्गेट; वाचाळपणा नडला?

author img

By

Published : Jul 12, 2022, 5:53 PM IST

Updated : Jul 12, 2022, 9:11 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde ) यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेचे खासदारही संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांच्यावर नाराज आहेत. एकनाथ शिंदे गटाच्या ( Rebel Eknath Shinde Group ) बंडखोरीला संजय राऊत जबाबदार असल्याचे बंडखोर आमदारांचे (Rebel Siv sena MLA ) म्हणणे आहे. शिवसेनेची आजची परिस्थिती फक्त संजय राऊतांमुळेच झाल्याचा आरोप आमदारांनी केला आहे.

MP Sanjay Raut
खासदार संजय राऊत

मुंबई - शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत ( MP Sanjay Raut ) हे बंडखोर शिवसेना आमदारांच्या निशाण्यावर आल्यानंतर आता शिवसेनेच्या खासदारांनीही ( Criticism of Shiv Sena MP Sanjay Raut ) त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे संजय राऊत अचानक शिवसेनेतील आमदार, खासदारांच्या निशाण्यावर, का यायला लागले? त्याची कारण जरी, अनेक असली तरी सुद्धा संजय राऊत यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांच्याशी असलेली जवळीक हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे.

Eknath Shinde Group
एकनाथ शिंदे गट

संजय राऊत यांनी गुंते वाढवले? कट्टर शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत अशी ओळख असलेले एकनाथ शिंदे हे बंडखोरी ( Rebel Siv sena MLA ) करतील असं स्वप्नातही ठाकरे कुटुंबीयांनाच काय, तर एखाद्या शिवसैनिकालाही वाटलं नसेल. परंतु एकनाथ शिंदे यांची बंडखोरी ही साधीसुधी नसून तब्बल ४० शिवसैनिक आमदार सोबत घेऊन त्यांनी शिवसेना पक्षालाच खिंडार पाडलं. सध्याच्या घडीला शिवसेना पक्षाची झालेली ही वाताहात सावरायला किती वर्ष जातील, त्याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठीण आहे. परंतु हे सर्व घडण्यामागे शिवसेना खासदार, प्रवक्ते संजय राऊत हेच जबाबदार असून त्यांच्यामुळेच शिवसेनेची ही परिस्थिती झाली आहे, असा आरोप बहुतेक बंडखोर आमदारांनी केला आहे.

संजय राऊत लोकांची मन दुखावली - संजय राऊत आपली भूमिका दररोज वेगवेगळ्या भाषेत प्रकट करत आले आहेत. महाराष्ट्राची संस्कृती नसलेल्या भाषेत ते बऱ्याचदा बोलतात. त्यामुळे लोकांची मन दुखावली जातात. संजय राऊत यांनी कधी कुणाची आई काढली, कुणाला डुक्कर म्हणाले, कुणाचा बळी द्या म्हणाले असल्याचा आरोप बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे. यानंतर शिवसेनेचे खासदार सुद्धा संजय रावतांवर निशाणा साधताना दिसून येत आहेत. कालच मातोश्रीवर झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार एनडीएच्या द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासंदर्भात संजय राऊत वगळता शिवसेनेच्या इतर खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दर्शविला. परंतु, संजय राऊत यांनी त्यांना पाठिंबा देण्यास नकार दिल्याची माहिती आहे. त्यावरून तिथे सुद्धा खलबत्त सुरू झाले होते. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यामध्ये हस्तक्षेप करत एक दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असे सांगितले. त्या बैठकीतून सुद्धा संजय राऊत नाराज होऊन बाहेर पडले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

अडीच वर्षांनी हिंदुत्व कसं जागं झालं? २०१९ साली काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर केलेली महाविकास आघाडी ही अनैसर्गिक असून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कदापि त्यांच्याशी आघाडी होऊ शकत नाही, अशी मंशा एकनाथ शिंदे गटातील सर्व बंडखोर आमदारांची आहे. २०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली, त्यादरम्यान ही बंडखोडी का करण्यात आली नाही? त्याचबरोबर २०१४ साली जेव्हा युती तोडली तेव्हा यातील एकही आमदार काही बोलला नाही. मग आता अडीच वर्षांनी हे हिंदुत्व जागं कसे झालं ? असा प्रश्न खुद्द संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर २०१९ मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री झालेल्या संदिपान भुमरे यांनी माझ्या ऑफिसमध्ये येऊन लोटांगण घातलं होतं असेही संजय राऊत म्हणाले होते. 'तुम्ही होतात म्हणून हे सरकार स्थापन झालं. आमच्यासारख्या साध्या माणसाला मंत्रीपद भेटलं,' असं वाक्य ही संदिपान भुमरे यांनी केल्याचे राऊत म्हणाले होते. इतकेच नाही तर पुरावा म्हणून त्यांच्याकडे त्याचं रेकॉर्डिंग ही आहे, असेही ते म्हणाले. अडीच वर्षांमध्ये सत्ता भोगल्यानंतर आता अचानक संजय राऊत हे टीकेचे धनी का बरे झाले? जे संजय राऊत सत्ता स्थापनेसाठी मायबाप होते तेच आता अडीच वर्षानंतर शिवसेनेची वाहतात करणारे सर्वेसर्वा कसे झाले? असा प्रश्न सर्व नागरिकांना पडला आहे.

हेही वाचा - Sanjay Raut on presidential election : राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही- संजय राऊत

आत्ता शिवसेना वाचवण्यासाठी आरपारची भूमिका? २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन होत असताना संजय राऊत मुख्य प्रकाश झोतात राहिले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत सतत बैठकांच सत्र घेऊन राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसच्या हायकमांडशी बोलणी करून त्यांनी सरकार स्थापनेत महत्वाची भुमिका निभावली होती. पण, त्यानंतर संजय राऊत यांचं त्यांच्या शिवसेनेतील कार्यकर्ते, नेते यांच्याशी कमी परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी जवळीक फार मोठ्या प्रमाणात वाढली. मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी दिला गेला. त्या खालोखाल काँग्रेसला दिला गेला. तर, शिवसेनेच्या वाट्याला फक्त १९ टक्के विकास निधी दिला गेला.

आर पार च्या भूमिकेत शिंदे गटाचे बंड - यावरून सुद्धा शिवसेनेच्या नेत्यांच्या मनात या गोष्टीविषयी खदखद होती. विकास निधी नाही, पक्षप्रमुखांची भेट नाही, दिलेल्या पत्राला उत्तर नाही, केलेल्या फोनला रिस्पॉन्स नाही, या एक ना अनेक कारणांनी शिवसेनेच्या नेत्यांच्या मनातील खदखद वाढत गेली. अशात त्यांना वर्षा व मातोश्री वरील दरवाजे बंद झाले होते. यामागचे कारण संजय राऊतच आहेत अशी भावना त्यांची झाली होती, आजही आहे. संजय राऊत मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे शरद पाहून दोन्ही ठिकाणी पाय रोवून होते. आता शिवसेना पक्ष टिकवायचा असेल तर ठाकरे कुटुंबाची, त्याचबरोबर संजय राऊत यांची पर्वा न करता आर पार च्या भूमिकेत शिंदे गट दिसत येत असून आता त्याला खासदारांची ही साथ लाभणार आहे.

हेही वाचा - Politics In Maharashtra : वडिलांनंतर मुलांच्या हाती पक्षाची धुरा, काही मुलांनी सांभाळला तर काहीजण देतायत अस्तित्वाची लढाई

Last Updated : Jul 12, 2022, 9:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.