ETV Bharat / city

मुंबईत भक्तिमय वातावरणात ७ दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन; ऐन पावसातही भक्तांचा उत्साह शिगेला

author img

By

Published : Sep 9, 2019, 7:40 AM IST

Updated : Sep 9, 2019, 7:55 AM IST

ढोल ताशांचा गजर...फुलांची आरास मांडत...गुलालाची उधळण करीत...गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषाने मुंबई दणाणून गेली. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समुद्र, तलाव आणि कृत्रीम तलावात बाप्पांचे विसर्जन शांततेत पार पाडले.

७ दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन

मुंबई - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत गणेश भक्तांनी अत्यंत भक्तिभावाने पावसात आज सात दिवसांच्या गणपतीला निरोप दिला. यावेळी काही ठिकाणी गौरींचेही विसर्जन करण्यात आले. मुंबईच्या समुद्र किनारी व कृत्रिम तलावात रात्री 9 वाजेपर्यंत ऐकूण 10 हजार 72 गौरी आणि गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

सोमवारी गणरायाचे आगमन झाले आणि भक्तीरसाने अवघी मुंबई न्हावून निघाली. सर्वत्रच चैतन्याचे व उत्साहाचे वातावारण होते. सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी मुंबईतील चौपाट्या, तलाव आणि जलाशय परिसरात गणपती विसर्जनासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली होती.

७ दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन

हेही वाचा - शिल्पा शेट्टीने धुमधडाक्यात केलं गणेश विसर्जन, पाहा तिचा खास अंदाज

ढोल ताशांचा गजर...फुलांची आरास मांडत...गुलालाची उधळण करीत...गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषाने मुंबई दणाणून गेली. मुंबईतील प्रत्येक गल्लीबोळात आणि प्रत्येक रस्त्यावर ढोलताशांचा गजर आणि गणरायाचा घननाद सुरू होता. पावसाची रिपरिप असतानाही भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समुद्र, तलाव आणि कृत्रीम तलावात बाप्पांचे विसर्जन शांततेत पार पाडले. विसर्जनस्थळी पालिकेतर्फे जय्यत तयारी ठेवण्यात आली होती.

हेही वाचा - 'मुंबईचा राजा' पाहण्यासाठी भाविकांची गर्दी, राम मंदिराचा साकारला देखावा

10 हजार गणेश, गौरी मूर्तींचे विसर्जन -
रात्री 9 वाजेपर्यंत ऐकूण 10 हजार 72 गौरी आणि गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात 348 सार्वजनिक, 9576 घरगुती, तर 148 गौरींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन करण्यात आलेल्या 10 हजार 72 पैकी कृत्रिम तलावात 1551 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक 24 घरगुती 1499 तर 28 गौरींचा समावेश आहे.

Intro:मुंबई - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत गणेश भक्तांनी अत्यंत भक्तिभावाने पावसात आज सात दिवसांच्या गणपतीला निरोप दिला. यावेळी काही ठिकाणी गौरींचेही विसर्जन करण्यात आले. मुंबईच्या समुद्र किनारी व कृत्रिम तलावात रात्री 9 वाजेपर्यंत ऐकूण 10072 गौरी आणि गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. Body:सोमवारी गणरायाचे आगमन झाले आणि भक्तीरसाने अवघी मुंबई न्हावून निघाली. सर्वत्रच चैतन्याचे व उत्साहाचे वातावारण होते. सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी मुंबईतील चौपाट्या, तलाव आणि जलाशय परिसरात गणपती विसर्जनासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली होती.

ढोल ताशांचा गजर...फुलांची आरास मांडत...गुलालाची उधळण करीत... गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषाने मुंबई दणाणून गेली. मुंबईतील प्रत्येक गल्लीबोळात आणि प्रत्येक रस्त्यावर ढोलताशांचा गजर आणि गणरायाचा घननाद सुरु होता. पावसाची रिपरिप असतानाही भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समुद्र, तलाव आणि कृत्रीम तलावात बाप्पांचे विसर्जन शांततेत पार पाडले. विसर्जनस्थळी पालिकेतर्फे जय्यत तयारी ठेवण्यात आली होती.  

10 हजार गणेश, गौरी मूर्त्यांचे विसर्जन -
रात्री 9 वाजेपर्यंत ऐकूण 10072 गौरी आणि गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. त्यात 348 सार्वजनिक, 9576 घरगुती, तर 148 गौरींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन करण्यात आलेल्या 10072 पैकी कृत्रिम तलावात 1551 मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक 24 घरगुती 1499 तर 28 गौरींचा समावेश आहे.

सोबत vis Conclusion:
Last Updated : Sep 9, 2019, 7:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.