महाराष्ट्र

maharashtra

"बिश्नोई गँगला संपवून टाकू"; सलमान खानच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा - Salman Khan House Firing Case

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 7:10 PM IST

Updated : Apr 16, 2024, 7:53 PM IST

CM Eknath Shinde Meet Salman Khan
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली सलमान खानची भेट

Salman Khan House Firing Case : बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील निवासस्थानाबाहेर (गॅलेक्सी अपार्टमेंट) गोळीबार केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुजरातमधून दोन जणांना अटक केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde) सलमानच्या राहत्या घरी (गॅलेक्सी अपार्टमेंट) जाऊन त्याची भेट घेतली आहे.

प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई Salman Khan House Firing Case :हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट समोर गोळीबाराची घटना घडल्यानंतर परिसरात आणि देशातील चाहत्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, मुंबई पोलिसांनी दमदार कामगिरी करत गोळीबार करणाऱ्यांना बेड्या ठोकल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज अभिनेता सलमान खानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. भेटीवेळी सलमान खान याचे वडील, ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान उपस्थित होते. यावेळी माजी आमदार बाबा सिद्दीकी, आमदार झिशान सिद्दीकी आणि युवासेनेचे राहुल कनाल हे देखील उपस्थित होते.


सलमान सोबत आहोत: भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सलमान खानची आत्ताच भेट घेतली असून ही सदिच्छा भेट होती. गॅलेक्सी अपार्टमेंट समोर फायरिंग करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी बिहार येथील रहिवासी असून पोलिसांनी 25 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी घेतली आहे. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू असून चौकशीच्या माध्यमातून सर्व सत्य बाहेरील असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलाय. तसंच मुळापर्यंत जाऊन चौकशी करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्यात. या घटनेमागे कोण आहे याची चौकशी करून पोलीस कठोर कारवाई करतील. यापुढं अशा प्रकारची हिंमत कोणी करता कामा नये अशा प्रकारची जरब पोलीस त्यांच्यावर बसवतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.

सुरक्षेची जबाबदारी सरकारची: सलमान खान आणि त्यांच्या नातेवाईकांना पोलीस सुरक्षा वाढवण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना देण्यात आल्यात. सरकार सलमान खानच्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्याच्या सुरक्षेची सरकारची जबाबदारी आहे. पुन्हा अशा प्रकारचे धाडस कोणी करू नये याची काळजी सरकार घेईल, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.




मुंबई, राज्यात अंडरवर्ल्ड संपुष्टात: महाराष्ट्र आणि मुंबईत कोणतेही गॅंगवॉर नाही. संपूर्ण अंडरवर्ल्ड संपुष्टात आलं आहे. बिश्नोईला संपून टाकू. मुंबईत पोलीस आहेत. हा महाराष्ट्र आहे इथे कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. मुंबईत कोणाची दादागिरी चालू देणार नाही. हे लोकांचं सरकार आहे. यामध्ये ज्या कोणत्या गॅंगचा हात असेल तर त्याला पूर्णपणे उखडून फेकू असा इशारा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय. त्याचबरोबर आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. मुंबईला पैसे कमविण्याकरिता...सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या पालकांनी काय दिली प्रतिक्रिया? - Salman Khan House Firing Case
  2. सलमान खान गोळीबार प्रकरण; 1 महिन्यापासून पनवेलमध्ये राहत होते आरोपी; गुजरातमधून हलली गोळीबाराची सूत्रे - Salman Khan Firing Incident
  3. महाराष्ट्रात गोळीबारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ; का होतायेत गोळीबार? कोण जबाबदार? - Firing Cases In Maharashtra
Last Updated :Apr 16, 2024, 7:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details