महाराष्ट्र

maharashtra

सांगलीत अखेर ऊस दराची कोंडी फुटली, दत्त इंडियाकडून एकरकमी एफआरपी जाहीर

By

Published : Oct 28, 2021, 8:37 PM IST

Updated : Oct 28, 2021, 8:56 PM IST

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एफआरपी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून अद्याप एफआरपी जाहीर करण्यात आली नसल्याने जिल्ह्यात उसाच्या दराची कोंडी निर्माण झाली होती. मात्र सर्वप्रथम सांगलीतल्या दत्त इंडिया कंपनी संचलित वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडली आहे.

दत्त इंडियाकडून एकरकमी एफआरपी जाहीर
दत्त इंडियाकडून एकरकमी एफआरपी जाहीर

सांगली - सांगलीतील ऊसदराची कोंडी अखेर फुटली आहे. दत्त इंडिया संचलित वसंतदादा सहकारी साखर कारखान्याकडून सांगली जिल्ह्यातील एफआरपी जाहीर करण्यात आला आहे. कंपनीकडून 2 हजार 821 रुपये एकरकमी एफआरपी जाहीर करून ऊसाचा गाळप सुरू करण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून स्वागत करण्यात आले आहे.



ऊसाचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केला. मात्र, एफआरपी जाहीर न केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू करण्यात आले होते. ऊस तोड व ऊस वाहतूक रोखत ऊस आंदोलन सुरू केले होते.

दत्त इंडियाकडून एकरकमी एफआरपी जाहीर

हेही वाचा-हे देवा! या सरकारला एफआरपीचे तुकडे न करण्याची सद्बुद्धी दे- राजू शेट्टी

एफआरपीची कोंडी फुटली...

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एफआरपी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून अद्याप एफआरपी जाहीर करण्यात आली नसल्याने जिल्ह्यात उसाच्या दराची कोंडी निर्माण झाली होती. मात्र सर्वप्रथम सांगलीतल्या दत्त इंडिया कंपनी संचलित वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडली आहे.

हेही वाचा-'मातोश्री' साखर कारखान्याकडू शेतकऱ्यांचे पैसे थकीत, शेतकऱ्यांनी पुकारले आंदोलन

2 हजार 821 रुपये एकरकमी एफआरपी तसेच कारखाना कामगारांना यंदाचा दिवाळीत सव्वादोन पगार बोनसही दत्त इंडिया कंपनीकडून जाहीर करण्यात आल्याची माहिती दत्त इंडिया कंपनीचे व्यवस्थापक मृत्यूंजय शिंदे यांनी दिली आहे.

त्या कारखान्यांच्या विरोधात आंदोलन..

वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ऊस गाळप शुभारंभप्रसंगी एफआरपीची घोषणा करण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडूनही या जाहीर झालेल्या एफआरपीचे स्वागत करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या इतर कारखान्यांनी वसंतदादा कारखानाप्रमाणे एकरकमी एफआरपी जाहीर करावी, अशी मागणी स्वाविभामी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे. जे कारखाने एकरकमी एफआरपी जाहीर करणार नाहीत, त्यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील इतर कारखाने एफआरपीबाबतीत काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दरम्यान, एफआरपी जाहीर झाल्याशिवाय साखर कारखाने सुरू होवू देणार नाही, अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस तोड व ऊस वाहतुक बंद पाडली आहे. तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे शेतकरी संघटनेने ऊस वाहतुक करणारा एक ट्रक आणि दोन ट्रॅक्टरची तोडफोड केली होती.

हेही वाचा-विरोधकांच्या आरोपांनंतर अजित पवारांनी दिली 65 कारखान्यांची यादी

Last Updated :Oct 28, 2021, 8:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details