महाराष्ट्र

maharashtra

'कोणत्याही परिस्थितीत ऊस परिषद घेणारच'

By

Published : Oct 7, 2020, 8:08 PM IST

येत्या आठवड्याभरात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी गावोगावी सर्व शेतकऱ्यांची बैठक घेऊन ऊस परिषदेची तयारी करावी. तसेच, गाव बैठकीमध्ये, साखर कारखान्यांकडून तीन टप्यात एफ.आर.पी देण्याबाबत शेतकऱ्यांवर दबाव टाकून सह्या घेतल्या असल्याने सर्व कार्यकर्त्यांनी संघटनेच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एक रक्कमी एफआरपी मिळण्यासाठी साखर आयुक्तांकडे अर्ज पाठवण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

राजू शेट्टी
राजू शेट्टी

कोल्हापूर- यंदाची १९वी ऊस परिषद कोणत्याही परिस्थितीत घेणारच असून, ऊस परिषदेत दराचा निर्णय झाल्याशिवाय साखर कारखानदारांनी धुराडे पेटवू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. ऊस परिषदेची तारीख अद्याप ठरलेली नसून परिषदेची तारीख नंतर जाहीर करू, असेही शेट्टी म्हाणाले.

चालू वर्षीच्या उस गळीत हंगामाचा बिगूल वाजू लागला आहे. या पार्श्वभूमीवर चालू वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या ऊस परिषदेच्या नियोजनाबाबत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची शिरोळ येथील राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. येत्या आठवड्याभरात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी गावोगावी सर्व शेतकऱ्यांची बैठक घेऊन ऊस परिषदेची तयारी करावी. तसेच, गाव बैठकीमध्ये, साखर कारखान्याकडून तीन टप्यात एफ. आर. पी. देण्याबाबत शेतकऱ्यांवर दबाव टाकून सह्या घेतल्या असल्याने सर्व कार्यकर्त्यांनी संघटनेच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एक रक्कमी एफआरपी मिळण्यासाठी साखर आयुक्तांकडे अर्ज पाठवण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

सध्या सरकारने सिनेमागृह, हॉटेल, रेस्टॉरंट यांना सुरू करण्यास परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने ऊस परिषदेला परवानगी द्यावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, राजकीय व्यवहार समितीचे अध्यक्ष सावकर मादनाईक, प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष पोपट मोरेसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा-ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : कोतोलीमधील बँक ऑफ इंडियाने घातला मंडप, नागरिकांची गैरसोय झाली दूर

ABOUT THE AUTHOR

...view details