महाराष्ट्र

maharashtra

ठाणे जिल्ह्यात काँग्रेस व्हेंटिलेटरवर असनूही 'एकला चलो रे'चा नारा; मात्र 'या' नेत्याने काढली हवा

By

Published : Aug 28, 2021, 9:47 AM IST

Updated : Aug 28, 2021, 2:08 PM IST

जिल्ह्यात एकूण सहा महापालिका आणि दोन नगरपालिका आहेत. यातील बहुतांशी महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात आहे. काँग्रेस प्रदेश पातळीवरील नेतृत्वाने ठाणे जिल्ह्याकडे कधीही लक्ष दिले नाही. त्यातही काँग्रेसने कल्याणचे संजय दत्त आणि मीरा भाईंदरचे मुझफ्फर हुसेन यांना विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व दिले. मात्र जिल्ह्यात काँग्रेस वाढविण्यास त्यांच नेतृत्व सक्षम ठरलेले नाही.

काँग्रेस व्हेंटिलेटरवर असनूही 'एकला चलो रे'चा नारा
काँग्रेस व्हेंटिलेटरवर असनूही 'एकला चलो रे'चा नारा

ठाणे - काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था खूपच बिकट आहे. शिवाय जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतही काँग्रेसची फारशी ताकद नाही. विशेष म्हणजे राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेत काँग्रेस एक घटक पक्ष म्हणून सामील आहे. मात्र राज्यात सत्ता असतानाही राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरलेल्या ठाणे जिल्ह्यात काँग्रेस व्हेंटिलेंटरवर असूनही आगामी महापालिका निवडणुकित 'एकला चलो रे'चा नारा दिला. मात्र काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्षासह स्थानिक नेत्यांनी दिलेल्या 'एकला चलो'च्या घोषणाच्या फुग्यातून हवा काढली असून यापुढे सर्वच निवडणुका महाविकास आघाडीतील घटक पक्षासोबत लढविल्या जातील, असे बुलढाण्यात जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये स्थानिक स्वराज निवडणुका लढविणाऱ्यावरून एकमत झाल्याचे दिसून येत नाही.

काँग्रेस व्हेंटिलेटरवर असनूही 'एकला चलो रे'चा नारा; मात्र 'या' नेत्याने काढली हवा
जिल्ह्यात काँग्रेस वाढविण्यास नेतृत्व सक्षम नाही; त्यामुळे..


काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती झाली आहे. आक्रमक नेतृत्व अशी नानांची ओळख आहे. त्यामुळे नव्या नेतृत्वामुळे तरी जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी मिळणार का? असाच प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. मुंबई लगत असलेला ठाणे जिल्हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. जिल्ह्यात एकूण सहा महापालिका आणि दोन नगरपालिका आहेत. यातील बहुतांशी महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात आहे. काँग्रेस प्रदेश पातळीवरील नेतृत्वाने ठाणे जिल्ह्याकडे कधीही लक्ष दिले नाही. त्यातही काँग्रेसने कल्याणचे संजय दत्त आणि मीरा भाईंदरचे मुझफ्फर हुसेन यांना विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व दिले. मात्र जिल्ह्यात काँग्रेस वाढविण्यास त्यांच नेतृत्व सक्षम ठरलेले नाही.

राजकीय घडामोडींना वेग ..

जिल्ह्यातील महापालिका व नगरपालिकेत काँग्रेस नगरसेवकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा आलेख घसरल्याचे आकडेवारीवरून दिसून येतो. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला सक्षम नेतृत्वाची उणीव नेहमीच भासली आहे. मात्र त्याकडे वरिष्ठांकडून नेहमीच कानाडोळा केल्याने जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. नवी मुंबई, कल्याण - डोंबिवली, अंबरनाथ आणि कुळगाव–बदलापूर या तीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील नव्या समीकरणाचा परिणाम या निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील काँग्रेसला फुटीचे ग्रहण ..

नवी मुंबईत एक हाती वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादीचे ५० नगरसेवक माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे नवी मुंबईत भाजपचं वर्चस्व आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. भिवंडी महापालिकेत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती. ९० जागांच्या भिवंडीत महापालिकेत एकट्या काँग्रेसने ४७ जागा जिंकल्या होत्या. मात्र १८ नगरसेवक हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता भिवंडीत काँग्रेसचे २९ नगरसेवक आहेत. अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूरमध्येही काँग्रेसची फारशी ताकद नाही. इथल्या दोन्ही नगरपालिका सेनेच्या ताब्यात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला बळ देण्याची गरज आहे. मात्र आदीच जिल्ह्यातील कॉग्रेसला फुटीचे ग्रहण लागल्याने आगामी महापालिका निवडणुकीत कशी रणनीती आखणार हे येत्या काळात समोर येणार आहे.

जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्रीपदे ..

ठाणे जिल्ह्यात विधानसभेचे १८ मतदारसंघ आहेत. ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेला ६ जागाच मिळाल्या होत्या. भाजपने ७ जागांवर यश मिळवले होते. राष्ट्रवादी ४, आणि अपक्षाने एका जागेवर विजय मिळवला होता. २०१९ च्या निवडणुकीत भाजप ८, शिवसेना ५, राष्ट्रवादी २, मनसे १, समाजवादी १ आणि अपक्ष १ जागांवर विजय मिळवला आहे. जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मंत्रीपद देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद मजबूत करण्यासाठीच शिवसेना व राष्ट्रवादीने दोन मंत्रीपद दिली आहेत.

काँग्रेसकडून भूमीपुत्र कार्यकर्त्यांना पक्षाचं बळ नाही...


जिल्ह्यात मराठी भाषिक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आगरी कोळी भूमिपूत्रांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. शिवसेना भाजप पूर्वी आगरी कोळी समाजाची ताकद काँग्रेसकडे होती. मात्र काँग्रेसकडून भूमीपुत्रांच्या संघटनेला बळ दिले गेले नाही. त्यामुळे त्या भाजप-शिवसेनेकडे वळल्या आहेत. तसेच जिल्ह्यात निरीक्षक अथवा प्रभारी म्हणून काँग्रेसने अमराठी पदाधिकारी सोपविण्यात आला. त्यामुळे काँग्रेस कार्यकत्यांमध्ये नेहमीच नाराजीची भावना दिसून येते.



Last Updated : Aug 28, 2021, 2:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details