ठाणे -कळवा परिसरात असलेल्या एका मदरसामध्ये शिक्षण घेणारी पाच अल्पवयीन मुले मारकुट्या शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आपल्या गावी जाण्यासाठी निघाले ( Five children ran away from madrasa in kalva ) . त्यावेळी कलव्याहून कल्याणच्या दिशेने ट्रेनने प्रवास करत असताना एका दक्ष महिला प्रवाशाने याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली ( female passenger informed the railway police ). रेल्वे पोलिसांनी डोंबिवली रेल्वे स्थानकात या पाच ही मुलांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी संबंधित मदरसामधील दोन शिक्षकांविरोधात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत हा गुन्हा कळवा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
मुलांसोबत गैरप्रकार -१ ऑगस्ट रोजी एका ट्रेनमध्ये पाच अल्पवयीन मुले बसली होती. ही मुले बिहार येथे आपल्या गावी जाण्यासाठी निघाली. मात्र लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेने या मुलांची चर्चा ऐकली. त्यांच्या चर्चेवरून मुलांसोबत काही तरी गैरप्रकार झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. महिलेने तात्काळ रेल्वे कंट्रोलला फोन करत याबाबत माहिती दिली .डोंबिवली जीआरपीने या पाच ही मुलांना तत्काळ डोंबिवली रेल्वे पोलीस स्थानकात ( Dombivli Lohmarg Police Station ) उतरवून ताब्यात घेतले.