महाराष्ट्र

maharashtra

हसन मुश्रीफ यांना बदनाम करण्याचा प्रयत्न हाणून पाडू - सतेज पाटील

By

Published : Sep 24, 2021, 2:59 PM IST

Updated : Sep 24, 2021, 3:05 PM IST

महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपा आणि सोमैया यांचा आहे. हाच प्रयत्न हाणून पाडू. मुश्रीफ यांनी यापूर्वीच खुलासा दिला असताना किरीट सोमैया यांना पुन्हा कोल्हापुरात येण्याची गरज काय? शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सोमैया यांनी कोल्हापुरात येऊ नये, अशी विनंती सतेज पाटील यांनी केली आहे.

कोल्हापूर पालकमंत्री
सतेज पाटील

कोल्हापूर - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपाचे नेते किरीट सोमैया यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी किरीट सोमैयांना इशारा दिला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खुलासा दिल्यानंतर सोमैयांनी कोल्हापुरात येण्याची गरज काय? विनाकारण मुश्रीफ यांना टार्गेट करून बदनाम करण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

हेही वाचा -नो एन्ट्री... किरीट सोमैयांना कोल्हापूरच्या मुरगूड शहरात कायमची बंदी, नगरपरिषदेचा ठराव

'सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न'

सतेज पाटील पुढे म्हणाले, की सोमैया हे हसन मुश्रीफ यांना विनाकारण बदनाम करत आहेत. त्यांचा तो प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपा आणि सोमैया यांचा आहे. हाच प्रयत्न हाणून पाडू. मुश्रीफ यांनी यापूर्वीच खुलासा दिला असताना किरीट सोमैया यांना पुन्हा कोल्हापुरात येण्याची गरज काय? शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सोमैया यांनी कोल्हापुरात येऊ नये, अशी विनंती सतेज पाटील यांनी केली आहे. आम्ही मुश्रीफ यांच्या पाठीशी ठामपणे आहोत. मुश्रीफांच्यावरील आरोप निराधार आहेत. वेळ आल्यावर सर्व बाहेर येईल, असेदेखील पाटील म्हणाले.

काय आहे वाद?

हसन मुश्रीफ यांनी १२७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा सोमैया यांचा आरोप आहे. मुश्रीफांनी हे आरोप फेटाळले आहेत. मात्र सोमैया हे त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. गडहिंग्लज साखर कारखान्याची लिलाव प्रक्रिया ही बोगस आहे. २०२०मध्ये ब्रिक्स इंडिया कंपनीला हा कारखाना देण्यात आला. मात्र ब्रिक्स इंडिया ही बेनामी कंपनी आहे. या कंपनीत ९८ टक्के शेअर कॅपिटल हे कोलकात्यातून आले आहेत. फक्त दोन टक्के शेअर हे मुश्रीफांच्या जावयाचे आहेत. मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्याशी संबंधीत कागदपत्र आयकर विभाग आणि ईडीकडे सुपूर्द केली जाणार', असे सोमैया म्हणाले होते.

हेही वाचा -स्वतःचे गाव राखता आले नाही; अन् संजय राऊतांना कसले आव्हान देता, मुश्रीफांची बोचरी टीका

मुश्रीफ यांचे काय म्हणणे?

किरीट सोमैया यांनी केलेले आरोप हे भाजपाच्या मोठ्या षडयंत्राचा भाग आहेत, असे मुश्रीफ यांनी सांगितले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे या प्रकरणाचे सूत्रधार आहेत. मी सतत केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या गैरवापराबद्दल बोलत होतो. म्हणून ते माझ्या मागे आहेत. पाटील यांनी त्यांना भाजपामध्ये येण्याची ऑफर दिल्याचा दावाही त्यांनी केला.

Last Updated : Sep 24, 2021, 3:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details