महाराष्ट्र

maharashtra

गांधी १५० : या ठिकाणी मिळाली 'तिरंग्या'ला मान्यता...

By

Published : Sep 25, 2019, 5:03 AM IST

पिंगली वेंकय्या

भारताचा राष्ट्रध्वज 'तिरंगा' हा कोणी तयार केला आणि महात्मा गांधींनी तो कुठे पाहिला? यामागची रंजक कथा...

अमरावती - महात्मा गांधींच्या तेलुगु प्रांताशी अनेक आठवणी जुळलेल्या आहेत. खासकरून विजयवाडाशी त्यांचे विशेष नाते होते. आपल्या आयुष्यभरात गांधीजींनी आंध्र प्रदेशच्या या भागाला सहा वेळा भेट दिली होती. गांधीजींच्या पहिल्याच भेटीत तब्बल ६ हजार तेलुगु भाषिक लोक स्वातंत्र्यलढ्यात बापूंच्या सोबत उभे राहिले. आपल्या तिसऱ्या भेटीत गांधीजींनी विजयवाडामध्ये लोकांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले.

गांधी १५० : या ठिकाणी मिळाली 'तिरंग्या'ला मान्यता...

१९२१ मध्ये बापू विजयवाडामध्ये सात दिवस राहिले होते. त्याचवेळी त्यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारी मंडळाची सभा देखील घेतली. बंदर रोड येथे सध्या असलेल्या बापू संग्रहालयाच्या जागेवर ही सभा घेण्यात आली होती. येथेच पिंगली वेंकय्या यांनी गांधीजींना 'तिरंगा' सोपवला होता. यावेळी सर्व राष्ट्रीय नेते उपस्थित होते.

गांधीजींच्या विजयवाडा शहराशी असलेल्या आठवणी जपून ठेवण्याच्या उद्देशाने तत्कालीन राष्ट्रपती झाकीर हुसैन यांनी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या टेकडीला 'गांधी हिल' नाव दिले.

आजही या टेकडीकडे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून पाहिले जाते. अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक आणि पिंगली वेंकय्या यांनी गांधीजींना तिरंगा सुपूर्द केल्याच्या आठवणी सांगणारे संगमरवरी पुतळे आजही तिथे उभे आहेत.

हेही वाचा : गांधी १५० : 'या' गावात झाला होता गांधीजींना विरोध..

Intro:Body:

national news


Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details