ETV Bharat / state

ओबीसींबद्दल 'हे' काय बोलले मनोज जरांगे पाटील? अन् भुजबळांवरही साधला निशाणा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 9:06 PM IST

Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil On OBC : नवी मुंबईतील कामोठे येथे मराठा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते आज (7 फेब्रुवारी) त्याचं उद्घाटन झालं. (Manoj Jarange Criticism Bhujbal) यावेळी त्यांनी माझा सर्वसामान्य ग्रामीण ओबीसींना विरोध नाही. परंतु, 'त्याला' मात्र सुट्टी नाही असं म्हणत त्यांनी मंत्री छगन भुजबळांवर निशाणा साधला.

मनोज जरांगे पाटील हे छगन भुजबळांवर टीका करताना

मुंबई Manoj Jarange Patil On OBC : मनोज जरांगे पाटील मराठा महोत्सवात मंत्री छगन भुजबळांविषयी बोलले की, ग्रामीण भागातील ओबीसींना माझा विरोध नाही; मात्र त्याला सुट्टी नाही. तो गप्प बसत नाही तर मी कशाला सोडू? तो गोरगरिबांचा नाही, मराठ्यांचा नाही आणि कोणाचाही नाही. (Maratha Festival) मी एका सर्वसामान्य घरातून आलेली व्यक्ती आहे. त्यामुळे सामान्य लोकांसाठी काम करतोय. राजकारणात जाणार का? या प्रश्नावर राजकारण लय लांब गेलंय. मी व्यासपीठाच्या खुर्चीवर बसेन; पण राजकीय नको, असंही स्पष्टीकरण जरांगेंनी दिलय.

मराठा समाजाच्या कुणबी नोंदी जुन्याच : मराठा समाजाच्या कुणबी नोंदी जुन्याच आहेत आणि जुन्या नोंदी असतील म्हणून त्या सापडतील ना? आमच्या जुन्याच नोंदी नव्यानं सापडल्या आहेत, असंही जरांगे पाटील म्हणाले. आतापर्यंत 57 लाख मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी आल्या असून तब्बल 2 कोटी मराठा बांधव हे आरक्षणाच्या कक्षेत आले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आणि आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही भरती करू नका. केली तर मराठा समाजासाठी जागा रिक्त ठेवा, असं मी महिनाभरापूर्वी सांगितलं होतं. आता फक्त शिकून मोठे व्हा! असा मराठा समाजाच्या युवकांना मनोज जरांगे पाटील यांनी संदेश दिला.


सोशल मीडियावर निव्वळ अफवाच : सोशल मीडियावर मराठा आंदोलनासंबंधी अफवा पसरवल्या जात आहेत. बहुदा ती मंत्री भुजबळांची माणसं असावीत. तसेच सोशल मीडियावरील लोकांना द्वेष पसरवण्याशिवाय दुसरा उद्योगच नाही, असंही जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाज अनेक वर्षानंतर एकत्र झाला आहे. त्यामुळे गैरसमज पसरवू नका. आपले मतभेद सोडून द्या. तुमच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी मतभेद नको असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

तर मराठा समाज वैभवशाली होईल : मराठा समाजाकडे प्रचंड खरेदी शक्ती आहे. दर महिन्याला वीस ते पंचवीस हजारांची खरेदी करतात. लाखोंची उलाढाल आहे. 'ब्रँडिंग' आणि 'बॉण्डिंग' या दोन शब्दांमध्ये मराठा महोत्सव आहे. येणाऱ्या काळात मराठा समाज वैभवशाली होईल, असा विश्वास मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे नांगर, तलवार, तराजू ह्या तिन्ही वस्तू आहेत. त्यामुळे त्यांच्या हातात यावेळी नांगर देऊन बळीराजाच्या घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा:

  1. २०१९ मध्ये लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांना जागा दाखवली; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
  2. सरकारची तिसरी टर्म दूर नाही, काँग्रेसनं BSNL, MTNL, HL ला बरबाद केलं; राज्यसभेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
  3. "अद्याप काशी, मथुरेचं मंदिर बाकी आहे", संघाच्या महत्वाच्या नेत्याचं पुण्यात मोठं विधान
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.