ETV Bharat / state

पुणे हिट अँड रन प्रकरणी 'त्या' अपघातस्थळी युवक काँग्रेसकडून निबंध स्पर्धा - Essay Competition On Pune Accident

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 26, 2024, 4:59 PM IST

Essay Competition On Pune Accident : पुण्यातील कल्याणी नगर चौकात एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दोघांना टक्कर मारली. या घटनेत दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. तरीसुद्धा बालहक्क् न्यायालयाने त्या मुलाकडून निबंध लिहून घेत जामीन मंजूर केला. या घटनेच्या निषेधार्थ आज (26 मे) युवक काँग्रेसच्यावतीनं कल्याणी नगर येथील त्या अपघातस्थळी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांसाठी रोख बक्षीसेही ठेवण्यात आली होती.

Essay Competition On Pune Accident
निबंध स्पर्धा (ETV Bharat Reporter)

पुणे Essay Competition On Pune Accident : पुण्यातील कल्याणी नगर येथे मागच्या रविवारी मध्यरात्री झालेल्या हिट अँड रन प्रकरणातील त्या अल्पवयीन मुलाला बाल हक्क न्यायालयाने काही अटींवर जामीन दिला होता. त्यात त्या अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्यास सांगितलं होतं. याच्याच निषेधार्थ आज (26 मे) युवक काँग्रेसच्यावतीनं कल्याणी नगर येथील त्या अपघातस्थळी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

निबंध स्पर्थेविषयी मत व्यक्त करताना स्पर्धक आणि आमदार (ETV Bharat Reporter)

'हे' होते निबंधाचे विषय : युवक काँग्रेसच्यावतीने कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणातील त्या घटनास्थळी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत माझी आवडती कार (पोशें, फरारी, मर्सडिज, की इतर), दारूचे दुष्परिणाम, नियम पाळा, अपघात टाळा, अर्थात कायदा सर्वांना सारखा आहे, आजची तरुण पिढी अन् व्यसनाधीनता, माझा बाप बिल्डर असता तर? रस्ते अपघात टाळण्यासाठी काय करावे? मी पोलीस अधिकारी झालो तर?, भारतात खरंच कायद्यापुढे समानता राहिली आहे का?, अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया यांचे खरे मारेकरी कोण? माझ्या स्वप्नातील पुणे शहर /असं असावं माझं पुणे शहर, अशा विविध विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. तसेच या स्पर्धेत प्रथम येणाऱ्यास 11 हजार, द्वितीय येणाऱ्यास 7777 आणि तिसऱ्या क्रमांकाला 5555 रुपये बक्षीस ठेवण्यात आलं आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदवत आपलं मत मांडलं.

मुलीने लिहिला मी पाहिलेला अपघात या विषयावर निबंध : यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या एका मुलीनं सांगितलं की, मी 'कायद्यात समानता राहिली की' या विषयावर निबंध लिहिला आहे. मला खरचं असं वाटतं की आपल्या इथं कायद्यात समानता राहिलेली नाही. तर एका लहान मुलीने 'मी पाहिलेला अपघात' या विषयावर निबंध लिहीत त्याने शाळेत जात असतानाचा अपघात आणि त्यानंतर ती आजारी पडली यावर आपल म्हणणं यात मांडलं आहे.

हेही वाचा :

  1. डोंबिवली स्फोटात सापडलेल्या मृतदेहांची होणार डीएनए चाचणी, दोन बोटांवरून मृतदेहाची पटली ओळख - DOMBIVLI BLAST
  2. जेवणासाठी बस ढाब्यावर थांबविली अन् घात झाला... ११ यात्रेकरुंचा बस अपघातात मृत्यू - Shahjahanpur accident
  3. गडकरींविरोधात मोदी, शाह आणि फडणवीसांचा कट; राऊतांच्या आरोपावर काय म्हणाले महायुतीतील नेते? - Sanjay Raut News
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.