ETV Bharat / politics

मोदींनी मला डोळा मारला, पण...; उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका - lok sabha election

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 10, 2024, 10:55 PM IST

Uddhav Thackarey : शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांच खैरे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे (ETV Bharat Reporter)

उद्धव ठाकरे (ETV Bharat Reporter)

छत्रपती संभाजीनगर Uddhav Thackarey : राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स येत आहेत आणि दुसरीकडं गुत्तेदार निवडणूक लढवत आहेत. नुसतं मोदी बाबा मोदी बाबा म्हणत शिक्का मारायचा का? ही उद्धव ठाकरेंची लढाई नाही, ही तुमची लढाई लढत आहे. माझं काही जात नाही, मला तर डोळा मारला त्यांनी मात्र, माझ्या महाराष्ट्राचं नुकसान होणार असेल, मला नकली म्हणतात तुम्हाला बाळासाहेबांच्या मुलाचा इंगा दाखवतो असा इशारा उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय. मला सल्ला दिला होता असं म्हणतात तर मग माझ्या हातापायांची हालचाल करु शकत नव्हतो, त्यावेळी तुमच्या चेले चपाटे यांनी माझ्या लोकांना फोडून सरकार पाडलं, तेव्हा शिवसेना प्रमुखांना काय वाटलं असतं हा विचार करायला पाहिजे होता. त्यांना काय वाटतं त्यांची चिंता करु नका. महाराष्ट्रानं तुम्हाला रस्त्यावर आणलं आता रोड शो करावे लागत आहेत, अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली. ते आज छत्रपती संभाजीनगरात चंद्रकांच खैरे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

निवडणूक आयोगावर मोदींचा दबाव : या सभेत बोलताना ते म्हणाले, शिंदे बोलताना ताणून बोलतात पोट साफ करायचा औषध घ्या. मोदी आणि शहा यांनी धनुष्यबाण देण्याचं काम केलं म्हणून ते आभार मानतात. माझ्या बापाचं नाव लावावं लागतं, तुझ्या वडिलांचं नाव लावू शकतं नाही. निवडणूक आयोगाचा वापर करुन नाव आणि चिन्ह दिलं. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना देखील वापरुन घेतलं. कोषारी नावाच्या माणसानं जे केले त्यावर न्यायालयानं ताशेरे ओढले. जो निर्णय दिला त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो. मात्र मोदी सर्वोच्च न्यायालयात दबाव टकण्याचं काम तुम्ही करत आहात. आम्हाला नकली म्हणता तुमचं नाटक चार जून पर्यंत चालतील. नोट बंदी जाहीर केली तशी, महाराष्ट्रात तुमच्या नावाचं नाणे बंद होईल, तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहतील. महाराष्ट्र मेला तरी चालेल गुजरात जिवंत राहिला पाहिजे ही तुमची वृत्ती असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

370 कलमसाठी आजही पाठिंबा पण... : आज केजरीवाल यांना जामीन मिळाला, त्यांना मोदी सरकारनं अटक केली. लोकसभेत सर्वांचं बहुमत घेऊन तिथले अधिकार दिल्लीचे स्वतःकडे घेतले. मग आरक्षणाचा निर्णय का नाही घेत? आता जे कायदे शेतकऱ्यांसाठी करत आहात. काही वर्षांपूर्वी काळे कायदे आणले त्यात किती शेतकरी गेले, मोदी सरकार हलत नव्हतं. निवडणुका झाल्यावर कायदा परत आणणार नाही कशावरुन? शिवसेनेवर दाढी वाल्याचं नाव लिहिलं उद्या तुमच्या जमिनींवर दुसऱ्याचं नाव लिहिणार नाही का? काश्मीर मधे 370 रद्द करायला आमचा तेव्हाही पाठिंबा होता आणि आजही राहील. असं असलं तरी अद्याप कायदा बदललेला नाही. 370 (ब) रद्द केलाय. या कायद्यानं बाहेरच्या लोकांना काश्मीर मधे जमीन विकत घेता येऊ लागली. पण यात अदानी यांनी सर्वाधिक जमीन घेतलीं, त्यांच्यासाठी कायदा केला का? कश्मीरमध्ये लिथिनियम मोठ्या प्रमाणात मिळते म्हणून त्यांनी जमिनी घेतल्या असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय.

तुमच्यावर आई वडिलांचे संस्कार नाही : त्यांना संविधान बदलायचं आहे. याचं मला सप्न नाही पडल, यांच्याच काही लोकांनी सांगितलं. आई भवानीची मशाल हातात आली आहे. ती पेटवा आणि सर्वांना सांगा. माझ्यावर आई वडिलांचे संस्कार केले, मात्र तुम्ही लहानपणापासून व्यस्त असाल म्हणून तुमच्यावर संस्कार करता आले नाही. तुमच्या बुद्धीवर दुष्परिणाम झालेला आहे. आमच्याकडं चेहरा नाही. मात्र तुमच्याकडे असलेला चेहरा घासूनपुसून गेलाय. दुसरा चेहरा कुठं राहिला भाजपाला माहिती नाही. मोदी कधी काळी स्नेही होते. गरज लागल्यावर आमची आठवण येते. मात्र त्यांनी पतंजली तेल लावून आराम करावा असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी मोदींना दिलाय.

हेही वाचा :

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांना ऑफर; राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया - lok sabha election
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.