ETV Bharat / politics

"आता या सरकारला आणि राज्यकर्त्याला उखडून फेकायची वेळ आली", शरद पवारांचा हल्लाबोल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 10:36 PM IST

Sharad Pawar criticized Modi government over various issues
"आता या सरकारला आणि राज्यकर्त्याला उपटून फेकायची वेळ आली", शरद पवारांचा हल्लाबोल

Sharad Pawar On Government : महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंट आघाडीचा कार्यकर्ता मेळावा आज (24 फेब्रुवारी) पुण्यात आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.

पुणे Sharad Pawar On Government : पुण्यातील काँग्रेस भवन येथे आज (24 फेब्रुवारी) महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंट आघाडीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलत असताना शरद पवार यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन मोदी सरकारला सुनावलं. "सरकारला जर शेतकऱ्यांची काळजी नसेल तर या सरकारला आणि राज्यकर्त्याला उपटून फेकावं लागेल," असंही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा : यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत शरद पवार म्हणाले की, "मोदींच्या राज्यात नेत्यांची भूमिका वेगळ्या वळणाला जात आहे. अलीकडंच मोदींचं भाषण बघितलं त्यामध्ये ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करतांना दिसले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशासाठी केलेलं कार्य संपूर्ण देश मान्य करतोय. पण पंतप्रधान मोदी नाही. त्यांना हातात माईक मिळाला की ते नेहरुंवर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू करतात", असा टोला पवारांनी लगावला.



सरकारला उखडून फेकण्याची वेळ : पुढं ते म्हणाले की, "आज शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, सरकार त्याकडं दुर्लक्ष करतय. आज एक वर्ष झालं हे शेतकरी संकटात आहेत. सर्व शेतकरी आपल्या कुटुंबासह रस्त्यावर आले आहेत. त्यामुळं आता या सरकारला आणि राज्यकर्त्याला उखडून फेकण्याची वेळ आली असल्याचं पवार म्हणाले.


भाजपाविरोधात सर्वांनी एकत्र यावं : "पंतप्रधान मोदी म्हणतात की राष्ट्रवादी (शरद पवार गट) हा भ्रष्टाचारी पक्ष आहे. जर खरंच तसं असेल तर त्यांनी चौकशी करावी आणि सत्य देशासमोर ठेवावं. पण ते फक्त टीका करू शकतात. सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना तुरुंगात टाकण्याचं काम ते करताय. आपल्याला आज यांना थांबवायचं असेल तर भाजपा विरोधातील सर्वांनी एकत्र येत एकजुटीनं काम करावं", असंही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

  1. डोलीतून रायगडावर पोहोचले शरद पवार; स्वतः 'तुतारी' वाजवत नव्या चिन्हाचं अनावरण
  2. शरद पवारांच नाव घेतल्याशिवाय देशातील राजकारण पूर्णच होत नाही - जितेंद्र आव्हाड
  3. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या चिन्हाचं ब्रँडिंग, पाहा व्हिडिओ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.