ETV Bharat / politics

तुमच्या नावाचा एकेरी उल्लेख नको असेल तर...; मनोज जरांगे पाटीलांचा फडणवीसांना इशारा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 5:26 PM IST

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. तुमच्या नावाचा एकेरी उल्लेख नको असेल तर तर मागण्या मान्य करा असं म्हणत जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय.

तुमच्या नावाचा एकेरी उल्लेख नको असेल, तर...; मनोज जरांगे पाटीलांचा फडणवीसांना इशारा
तुमच्या नावाचा एकेरी उल्लेख नको असेल, तर...; मनोज जरांगे पाटीलांचा फडणवीसांना इशारा

छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange Patil : तुमच्या नावाचा उल्लेख करताना एकेरी भाषा नको असेल तर मागण्या मान्य करा अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलीय. तसंच दिलेलं दहा टक्के आरक्षण ओबीसी मधून द्यावं आणि केंद्रातून ते वाढवून घ्यावं तरच हा विषय मार्गी लागू शकतो. तसंच एसआयटी चौकशी पूर्ण होण्याआधीच मला अटक करण्याची तयारी सुरू केलीय, असं जर झालं तर मला ज्या मार्गानं न्याल त्या मार्गावर तुम्हाला करोडो मराठा दिसतील, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिलाय.

मराठा समाज आहे मागास : यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, "कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्या समाजाचं मागासलेपण सिद्ध झालं पाहिजे. त्यामुळं आता झालेल्या सर्वेक्षणात मराठा समाज हा मागास सिद्ध झालाय. आता आरक्षण देण्यात अडचण असायला नको, सरकारनं दहा टक्के आरक्षण जाहीर केलं, मात्र ते टिकणारं नाही. त्यामुळंच ओबीसी मधून आरक्षण द्यावं आणि आरक्षणाची मर्यादा वाढवून घ्यावी हा एकच पर्याय राहिलेला आहे. जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत माझं आंदोलन मागं घेणार नाही." तसंच टीका करणाऱ्यांनी, मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात दिलेली माहिती ऐका म्हणजे मराठा समाज मागास आहे, हे स्पष्ट होईल असं देखील त्यांनी सांगितलं.

मराठा नेत्यांनी सोबत राहा : गेल्या दोन दिवसांपासून मराठा समाजाचे नेते आणि कार्यकर्ते देखील आपल्या नेत्यांची भाषा बोलू लागले आहेत. नेत्यांवर टीका केली की इतकं का लागलं? यापेक्षा समाजासाठी त्यांच्याकडं भांडा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं. मी जो लढा लढत आहे, तो मराठा समाजाच्या युवकांसाठी आहे. तुमच्या येणाऱ्या पिढ्या यामुळं चांगल्या होतील. त्यामुळं मराठा समाजाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांची किंवा पक्षाची बाजू घेऊन भांडण्यापेक्षा, मराठा समाजाला आरक्षणाबाबत अद्याप का निर्णय झालेला नाही? असा जाब विचारावा. दिलेलं आरक्षण टिकणारं नसल्यानं ओबीसी मधूनच आरक्षण द्या आणि कोटा वाढवून घ्या असा आग्रह धरावा, म्हणजे समाज तुमच्या पाठीशी राहील आणि तुम्हाला लक्षात ठेवेल. अन्यथा त्याचं नुकसानही तुम्हालाच होईल, असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना दिला. तर आरक्षण मिळाल्यावर त्याचा सर्वात आधी फायदा हे नेतेमंडळी आणि कार्यकर्तेच घेतील, अशी टीका देखील त्यांनी केलीय.

मला अटक करण्याची तयारी : सरकारनं जाहीर केलेलं दहा टक्के आरक्षण मी स्वीकारलं नाही. त्यामुळं आता माझ्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव आणला जातोय. अधिवेशनात एसआयटी चौकशी स्थापन केल्याची माहिती देण्यात आली. मात्र ही चौकशी पूर्ण होण्याआधीच मला अटक करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मला कोणत्याही क्षणी ताब्यात घेऊ शकतात. ज्या पद्धतीनं अंतरवाली आणि इतर ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांना अर्ध्या रात्रीतून अटक करण्यात आली आहे. त्यांना ज्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं तिथं प्रकरण दाखल न करता वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला ही प्रकरणं दाखवून अटक करण्यात येत आहे, हा कुठला न्याय आहे? यावर आपण न्यायालयात जाऊ शकतो. मात्र त्यामुळं अनेकांची नोकरी जाईल. आपण ते करणार नाही, तेवढी माणुसकी आपल्याकडं अजून शिल्लक आहे. मला जर अटक केली तर, ज्या मार्गानं मला घेऊन जाल त्या ठिकाणी करोडोंच्या संख्येनं मराठा बांधव रस्त्यावर बसलेले दिसतील, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.

निवडणूक लढवणार नाही : मराठा आंदोलनाची लढाई लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी जालना लोकसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवली. त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांचा आपण आदर करतो, त्यांनी सुरुवातीपासून आपल्या लढ्यात साथ दिली. मात्र निवडणूक लढणे हा माझा मार्ग नाही. मी उतावळा नाही, असं करणार नाही. मी फक्त माझ्या समाजासाठी काम करणार असून त्यांना न्याय मिळेपर्यंत लढत राहीन. मी एकनिष्ठ राहून काम करेन, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती, त्याप्रमाणं... - एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange Patil : तुमच्या नावाचा उल्लेख करताना एकेरी भाषा नको असेल तर मागण्या मान्य करा अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलीय. तसंच दिलेलं दहा टक्के आरक्षण ओबीसी मधून द्यावं आणि केंद्रातून ते वाढवून घ्यावं तरच हा विषय मार्गी लागू शकतो. तसंच एसआयटी चौकशी पूर्ण होण्याआधीच मला अटक करण्याची तयारी सुरू केलीय, असं जर झालं तर मला ज्या मार्गानं न्याल त्या मार्गावर तुम्हाला करोडो मराठा दिसतील, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिलाय.

मराठा समाज आहे मागास : यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, "कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्या समाजाचं मागासलेपण सिद्ध झालं पाहिजे. त्यामुळं आता झालेल्या सर्वेक्षणात मराठा समाज हा मागास सिद्ध झालाय. आता आरक्षण देण्यात अडचण असायला नको, सरकारनं दहा टक्के आरक्षण जाहीर केलं, मात्र ते टिकणारं नाही. त्यामुळंच ओबीसी मधून आरक्षण द्यावं आणि आरक्षणाची मर्यादा वाढवून घ्यावी हा एकच पर्याय राहिलेला आहे. जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत माझं आंदोलन मागं घेणार नाही." तसंच टीका करणाऱ्यांनी, मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात दिलेली माहिती ऐका म्हणजे मराठा समाज मागास आहे, हे स्पष्ट होईल असं देखील त्यांनी सांगितलं.

मराठा नेत्यांनी सोबत राहा : गेल्या दोन दिवसांपासून मराठा समाजाचे नेते आणि कार्यकर्ते देखील आपल्या नेत्यांची भाषा बोलू लागले आहेत. नेत्यांवर टीका केली की इतकं का लागलं? यापेक्षा समाजासाठी त्यांच्याकडं भांडा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं. मी जो लढा लढत आहे, तो मराठा समाजाच्या युवकांसाठी आहे. तुमच्या येणाऱ्या पिढ्या यामुळं चांगल्या होतील. त्यामुळं मराठा समाजाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांची किंवा पक्षाची बाजू घेऊन भांडण्यापेक्षा, मराठा समाजाला आरक्षणाबाबत अद्याप का निर्णय झालेला नाही? असा जाब विचारावा. दिलेलं आरक्षण टिकणारं नसल्यानं ओबीसी मधूनच आरक्षण द्या आणि कोटा वाढवून घ्या असा आग्रह धरावा, म्हणजे समाज तुमच्या पाठीशी राहील आणि तुम्हाला लक्षात ठेवेल. अन्यथा त्याचं नुकसानही तुम्हालाच होईल, असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना दिला. तर आरक्षण मिळाल्यावर त्याचा सर्वात आधी फायदा हे नेतेमंडळी आणि कार्यकर्तेच घेतील, अशी टीका देखील त्यांनी केलीय.

मला अटक करण्याची तयारी : सरकारनं जाहीर केलेलं दहा टक्के आरक्षण मी स्वीकारलं नाही. त्यामुळं आता माझ्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव आणला जातोय. अधिवेशनात एसआयटी चौकशी स्थापन केल्याची माहिती देण्यात आली. मात्र ही चौकशी पूर्ण होण्याआधीच मला अटक करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मला कोणत्याही क्षणी ताब्यात घेऊ शकतात. ज्या पद्धतीनं अंतरवाली आणि इतर ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांना अर्ध्या रात्रीतून अटक करण्यात आली आहे. त्यांना ज्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं तिथं प्रकरण दाखल न करता वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला ही प्रकरणं दाखवून अटक करण्यात येत आहे, हा कुठला न्याय आहे? यावर आपण न्यायालयात जाऊ शकतो. मात्र त्यामुळं अनेकांची नोकरी जाईल. आपण ते करणार नाही, तेवढी माणुसकी आपल्याकडं अजून शिल्लक आहे. मला जर अटक केली तर, ज्या मार्गानं मला घेऊन जाल त्या ठिकाणी करोडोंच्या संख्येनं मराठा बांधव रस्त्यावर बसलेले दिसतील, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.

निवडणूक लढवणार नाही : मराठा आंदोलनाची लढाई लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी जालना लोकसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवली. त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांचा आपण आदर करतो, त्यांनी सुरुवातीपासून आपल्या लढ्यात साथ दिली. मात्र निवडणूक लढणे हा माझा मार्ग नाही. मी उतावळा नाही, असं करणार नाही. मी फक्त माझ्या समाजासाठी काम करणार असून त्यांना न्याय मिळेपर्यंत लढत राहीन. मी एकनिष्ठ राहून काम करेन, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती, त्याप्रमाणं... - एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.