हैदराबाद Best Foods For diabetes- धावपळीचे जीवन, चुकीची जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे मधुमेही रुग्णांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या रोगाला नियंत्रण ठेवण्याकरिता योग्य आहाराची आवश्यकता आहे. एकदा मधुमेह झाला की आयुष्यभर हा रोग रुग्णाची पाठ सोडत नाही. साखर वाढण्याच्या भीतीनं रुग्ण आहार कमी घेतो. कोणता आहारा घ्यावा, याबाबत अनेकांमध्ये संभ्रमावस्था असते. मधुमेही लोकांनी कोणता आहार घ्याव? कोणती काळजी घ्यावाी? याबाबत माहिती घेऊ.
मधुमेहाचे काय आहेत लक्षणे- अनेकांना बालपणापासून मधुमेह असतो. जर वेळीच त्याकडं लक्ष दिलं नाही तर दुसऱ्या रोगाची लागण होण्याची भीत असते. आहाराच्या चुकीच्या सवयी आणि ताण हे मधुमेहाचे खरे कारण असल्याच डॉक्टर सांगतात. सतत लघवी लागणे, खूप तहान लागणे, खूप भूक लागणे आणि पाय सुजणे हे मधुमेहाची लक्षण आहेत. मधुमेही रुग्णांनी तीन महिन्यांतून एकदा HPA1c टेस्ट करणं आवश्यक असते. त्यामध्ये रिपोर्ट ३ ते ५.४ पातळीपर्यंत आल्यानंतर घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र, जर ५.६ पातळी असले तर प्रीडायबटिक श्रेणीत तुम्ही आहात. जर रिपोर्टमधील पातळी ही ७ हून अधिक असेल तर तुम्हाला मधुमेहाची लागण आहे.
आहारात याचा करा समावेश- मधुमेहाची लागण असेल तर आहार काळजीपूर्वक घ्यायला हवा. संतुलित आहारामुळे मधुमेहावर नियंत्रण राहते. रुग्णाला कोणत्याही स्थितीत शहरातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवावे लागते. आहारात काब्रोहायड्रेट, प्रथिने आणि फायबर असलेल्या आहारांचा समावेश करावा. प्रथिनयुक्त आहाराच्या तुलनेत कार्बोहायड्रेट आहारातून साखरेचे शरीरामधील प्रमाण वाढते.
हे टाळा- मधुमेह असलेल्या व्यक्तींनी मिठाचे कमी सेवन करायला हवे. मांसाहार, दुधापासूनचे पदार्थ, आईस्क्रीम, नारळाचे तेल आणि चिकनमध्ये स्निग्धतेचे (FAT) अधिक प्रमाण असते. मधुमेह असेल तर फास्ट फूड आणि तळलेल्या पदार्थांना टाळायला हवे.मधुमेह रुग्णांनी फायबर असलेले फळ, भाज्या, कडधान्य आहारात घेतले पाहिजे. तर नाष्टा करताना उपमा, बोंडा, वडा आणि पुरी खाऊ नये. त्याऐवजी ओट्स आणि डाळीपासूनचे पदार्थ नाष्ट्यात घ्यायला हवेत. दुपारी ऋतुप्रमाणं उपलब्ध होणारे फळ खावीत. दुपारी भात कमी आणि पालभाज्या जास्त खाव्यात. कधी-कधी बीटही आहारात घ्यावे. दिवसातून एकवेळ तरी डाळीचा आहारात समावेश करावा.
रात्री कधी जेवण करावे?मधुमेह असलेल्या रुग्णांनी चहा आणि कॉफी मर्यादित घ्यावी. रात्री ८ ते ८:३० वाजेपर्यंत जेवण करावे. त्यामुळे साखरेचे प्रमाण मर्यादित राहते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्री २० मिनिटे जेवल्यानंतर फिरावे. दिवसभरात ७ ते ८ वेळा अन्नपदार्थ खावे. नाष्टा करण्यात निष्काळजीपणा करू नये. नाष्ट्यात अंडे, कडधान्य, ब्रोकली आणि सॅलडचा समावेश करू शकता. मधुमेह रुग्णांनी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतेही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )
हेही वाचा-