ETV Bharat / bharat

बिहारमध्ये 'महागठबंधन' सरकार कोसळलं! नितीश कुमार भाजपाबरोबर करणार सत्ता स्थापन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2024, 10:39 AM IST

Updated : Jan 28, 2024, 12:35 PM IST

Bihar Political Crisis : बिहारच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ सुरू आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे राजीनाम दिला आहे. दरम्यान, आरजेडीकडूनही काही हालचाल होऊ शकते, अशीही चर्चा रंगली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

पटना (बिहार) : Bihar Political Crisis : बिहारमध्ये एनडीएच्या पाठिंब्याने नितीश कुमार पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याची दाट शक्यता आहे. थोड्याच वेळात नितीश कुमार राजीनामा देणार आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडल्यानंतर नितीश कुमार राजभवनाकडे राजीना देण्यासाठी दाखल झाले आहेत. दुसरीकडे लालू प्रसाद काही मोठा डाव टाकतील का? अशीही जोरदार चर्चा सुरू आहे.

अमित शाह यांचा तेलंगणा दौरा रद्द : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाच्या बैठकीला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तेलंगणा दौऱ्यावर येणार होते. परंतु, त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी शनिवारी सांगितलं. बिहारमध्ये राजकीय उलथापालथ सुरू असताना भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

  • "Today, I have resigned as the Chief Minister and I have also told the Governor to dissolve the government in the state," says JD(U) president Nitish Kumar pic.twitter.com/uDgt6sbBO3

    — ANI (@ANI) January 28, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मांझी यांचं समर्थनपत्र : जीतन राम मांझी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना रविवार रात्री उशिरा आपला पाठिंबा आहे असं समर्थन पत्र दिल आहे. काही दिवसांपtर्वी मांझी यांनी आजचं खेळ होईल असा आशयाचं ट्वीट केलं होत. तसंच, कुणी कुणाचं कायमचं शत्रू नाही, असही मांझी म्हणाले होते. परंतु, नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत बोलताना मांझी यांच्यावर जोरदार टीका केली होती.

आजच शपथ घेऊ शकतात : आज जेडीयू विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यानंतर लगेचच एनडीए विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यानंतर जेडीयू आणि भाजपचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेटतील. तेथे महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार सकाळी 10:30 नंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात. तसंच, एनडीएचा पाठिंबा असल्याचा पाठिंबा असल्याचं पत्र देऊन पुन्हा दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, अशी स्थिती आहे.

जेडीयू-भाजपमध्ये का तणाव निर्माण झाला : नितीश कुमार यांचं भाजपासोबत जाणं हे इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानला जातोय. काही दिवसांपुर्वी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नितीश कुमार इंडिया आघाडीसोबत राहीले असते तर पंतप्रधान होऊ शकले असते, अशी प्रतिक्रिया दिली होती. तर, दुसरीकडे लालू यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी 25 जानेवारी रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर 'वंशद्वेषाचे राजकारण' करत असल्याची टीका केली. त्यानंतर जेडीयू आणि आरजेडीमधील संबंध तणावपूर्ण झाले.

हेही वाचा :

1 बिहारमध्ये राजकीय वादळ! नितीश कुमार भाजपच्या गोटात गेल्याचं निश्चित, अ‍ॅक्शन मोडमध्ये आले तेजस्वी यादव

2 तर 'खेला' होणार; बिहारनंतर महाराष्ट्रातही इंडिया आघाडी तुटणार, 'या' खासदारानं केलं भाकीत

3 अखिलेश यादवांची काँग्रेससोबत युतीची घोषणा, उत्तर प्रदेशात देणार लोकसभेच्या 11 जागा

Last Updated : Jan 28, 2024, 12:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.