Kolhapur North By Election : 'श्रीराम कोणा एकट्याची जहागिरी नाही; ज्यांनी राजकारण केले, त्यांना जनतेने जागा दाखवली'
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15034482-thumbnail-3x2-maloji.jpg)
कोल्हापूर - काही मूठभर लोकांना वाटत होतं की श्री राम ही त्यांची जहागिरी आहे, पण श्री राम आमच्या हृदयात आहेत. आम्ही त्यांच्या नावाने कधीही राजकारण केले नाही. कारण आजपर्यंत आम्हाला आमचे हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज पडली नाही. त्यांचे हिंदुत्व बेगडे आहे हे सिद्ध झाले आहे असेही यावेळी मालोजीराजे छत्रपती यांनी म्हटले. यावेळी खासदार संजय मंडलिक आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी सुद्धा भाजपवर जोरदार निशाणा साधला.