EXCLUSIVE : कलम ३७० रद्द करण्याच्या प्रक्रियेत लोकशाहीची गळचेपी - तुषार गांधी
मुंबई - कलम ३७० रद्द करण्याच्या प्रकियेत लोकशाहीची गळचेपी केली जात असतानाही कोणताही आवाज त्याविरोधात उठवला जात नाही हे दुदैव आहे. कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हा इतिहास आहे. राजा हरिसिंहने केलेला करार इतिहास आहे, अशी प्रतिक्रिया महात्मा गांधी यांचे पंतू तुषार गांधी यांनी दिली. ३७० नव्हे तर अलिकडे संसदेत मंजूर होणाऱ्या कायद्यांवर चर्चा होत नाही हे दुर्देव आहे. काश्मीरची जनता भारतीय असेल तर त्यांना विश्वासात का घेतले नाही? आजही तिथली परिस्थिती सामान्य नाही. मग उद्याचे चित्र कसे असेल हा प्रश्न कायम आहे, असेही ते म्हणाले.