ईटीव्ही भारत विशेष : वन्यजीवांच्या संरक्षणासाठी 'त्या' सदैव तत्पर
राज्यभरात मोठे वनक्षेत्र वन्यजीव आणि वनसंपदेच्या संरक्षणासाठी राखीव करण्यात आले आहे. यामध्ये बिबट्या प्रवण क्षेत्रापासून ते मोठ्या व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे. वन्यजीव संवर्धनाचा हेतू यामागे आहे. या वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात महिला वनपाल आणि वनरक्षक कार्यरत आहेत. सतत गस्त घालणे, प्राण्यांच्या ठस्यांचे रेकॉर्ड्स ठेवणे यांसारखी अनेक कामं त्या करत आहेत. दररोजची पायपीट, ऊन, वारा, मुसळधार पाऊस या परिस्थितीतही या वाघिणी कर्तव्यावर उभ्या ठाकल्या आहेत. पाहा 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट...