रावसाहेब दानवे यांची जीभ घसरली, राहुल गांधींबद्दल केले 'हे' विधान
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12831952-thumbnail-3x2-daji.jpg)
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. ते भाजपने सुरू कलेल्या जन आशीर्वाद यात्रेत जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे जाहीर सभेत बोलत होते. 'गावात देवाला सोडलेला जो सांड असतो, जो कुणाच्याही शेतात जाऊन चरतो आणि कुठेही फिरतो' तसे राहुल गांधी आहेत, असे वक्तव्य दानवे यांनी यावेळी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना राहुल गांधी यांच्यावर दानवे यांनी ही टीका केली आहे.
Last Updated : Aug 20, 2021, 10:08 PM IST