खुर्ची टिकवायची असेल तर पवारांच्या मागे जाणे भाग पडते, चंद्रकांत पाटलांचा सेनेवर टोला
कोल्हापूर - शरद पवार यांनी पहिल्यांदा बंदची घोषणा केली. त्यानंतर बाकीच्यांना त्यांच्या मागून फरफटत जावे लागले. त्यामुळे खुर्ची टिकवायची असेल तर मागे जाणे भागच पडते, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवरला लगावला. दरम्यान, या बंदचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. एकीकडे कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत असताना त्यांनी हा बंद पुकारला, असेही ते म्हणाले.
Last Updated : Oct 11, 2021, 11:11 PM IST