Swabhimani Farmers Association टोलमाफी नाकारल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बंद पाडला टोलनाका
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16858153-thumbnail-3x2-toll.jpg)
पुण्यातील साखर संकुलावर आयोजित केलेल्या धडक मोर्चाला Dhadak morcha organized on sugar complex निघालेल्या शेतकऱ्यांच्या गाड्या टोलशिवाय सोडण्यास नकार दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या Swabhimani Farmers Association कार्यकर्त्यांनी आनेवाडी टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन Thiya Movement करत टोलनाका बंद पाडला. कोल्हापूरहून पुण्याकडे जात असताना साताऱ्यातील आनेवाडी टोलनाका व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या गाड्या टोलशिवाय सोडण्यास नकार दिल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. एकनाथ शिंदेच्या दसरा मेळाव्यास टोल माफी, मग शेतकऱ्यांना का नाही. अशी घोषणाबाजी सुरू केल्याने टोलनाक्यावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST