वीज वापरली तर पैसे भरावेच लागतील - ऊर्जामंत्री नितीन राऊत
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13938423-141-13938423-1639760801714.jpg)
औरंगाबाद - वीज कुणालाही फुकटात मिळणार नाही. वीजेचा वापर करत असाल तर बिल भरावे ( electricity use and bills for customers ) लागणार आहे, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत ( Ministers Nitin Raut ) यांनी मांडली. ते पुढे म्हणाले, की महावितरणही वीज फुकट घेत नाही. त्यांना वीज विकत घ्यावी लागते. महावितरण बंद झाली तर खासगी कंपन्या उतरतील. शेतकऱ्यांच्या व ग्राहकांच्या समस्यांची जाणीव आहे. कोळशांच्या अभावी आपल्या राज्यात वीज भारनियमन होऊ दिले ( No load shading in Maharashtra ) नाही. कोरोना व महापुराच्या संकटात तातडीने वीज दिली ( power supply in corona and flood ) आहे. ग्राहकांना सहकार्य करावे लागणार असल्याचे उर्जामंत्री राऊत ( Energy Minister Raut on electricity bills ) म्हणाले.