लोकांनी कमी स्वयंपाक करावा म्हणून सिलेंडरची भाववाढ - यशोमती ठाकूर
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13421477-thumbnail-3x2-j.jpg)
अमरावती - महागाईने सामान्य नागरिकांच बजेट कोलमडून गेले आहे. त्यामुळे जनता मेटाकुटीला आलेली आहे. यावर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. महागाई वाढवणारं केंद्र सरकार आहे याचा निषेध आहे. अच्छे दिन आणणाऱ्या लोकांनी महागाईचे दिन आणले. सिलेंडरचे भाव केंद्र सरकारने यासाठी वाढवले की लोकांनी स्वयंपाक करावा अशी उपरोधक प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी केली.