ETV Bharat / state

यवतमाळ : नागरिकांकडून निर्बंधाची पायमल्ली, विनाकारण फिरणाऱ्यांची प्रशासनाकडून कोरोना चाचणी

author img

By

Published : May 5, 2021, 5:14 PM IST

Updated : May 5, 2021, 6:46 PM IST

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. यामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, अनेक जण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. यामुळे प्रशासनाकडून रस्त्यावरच विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करत आहेत.

गर्दी
गर्दी

यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले असून सकाळी 11 वाजल्याच्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेसाठी नागरिक बाहेर पडू शकतात. मात्र, अनेकजण दुपारी विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत असल्यामुळे प्रशासनाकडून जागेवरच कोरोना चाचणी केली जात आहे.

आपल्या भावना व्यक्त करताना

दुकानाचे शटर अर्धे उघडेच

जीवनावश्यक वस्तूचे दुकाने वगळता इतर दुकानदार हे आपल्या दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी अनेक व्यावसायिक आपले दुकाने अर्धवट उघडून साहित्याची विक्री करताना दिसत आहे. व्यापारी वर्गात असणारा रोष लक्षात घेता प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा - यवतमाळमध्ये अमृत योजनेच्या टेस्टिंगमध्ये पाईपलाईन फुटली; पाच लाख लिटर पाणी वाया

Last Updated : May 5, 2021, 6:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.