ETV Bharat / state

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात हिंसाचाराचे प्रमाण वाढले- नाना पटोले

author img

By

Published : Aug 26, 2019, 10:35 PM IST

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी वर्ध्यातील आर्वी येथे महापर्दाफाश यात्रेदरम्यान मोदी सरकार वर जोरदार टीकास्त्र सोडत मोदी सरकार आल्यापासून देशात हिंसाचाराचे प्रमाण वाढले असल्याचे मत व्यक्त केले. जम्मू काश्मिर मुद्यावर बोलताना ते म्हणाले की काश्मिरातील परिस्थिती आणीबाणीपेक्षाही वाईट असून तेथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे.

महापर्दाफाश यात्रा


वर्धा- भारतात मोदी सरकार आल्यापासून देशात हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत मोबाईल बंदी करावी, असा जावई शोध हा जम्मू काश्मीरचे राज्यपाल आणत असतील तर तो त्यांचा विषय असू शकतो. जम्मू काश्मिरात जी परिस्थिती निर्माण करून ठेवली ती आणीबाणीपेक्षाही वाईट असल्याची टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली. ते वर्ध्यातील आर्वी येथे महापर्दाफाश यात्रेदरम्यान बोलत होते.

नाना पटोले

आपल्यात मनुष्यधर्म तो कुठल्याही जातीचा असो त्याला त्याचे स्वातंत्र्य असावे अशी व्यवस्था संविधानाने दिली आहे. सध्या जम्मू काश्मिरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. राहुल गांधी तेथे गेले आणि शिवसेनेच्या वतीने टीका करण्यात आली. ते पर्यटनासाठी तेथे गेले नाहीत असे उत्तर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिले. तुम्ही माणुसकीचा धर्म सोडला आहे. काँग्रेस माणुसकीचा धर्म पाळणारा आहे. आणि म्हणून आमचे राहुल गांधी तेथे गेले. यावर अशा प्रकारची टीका दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Intro:mh_war_03_nanapatole_on_rahul_gandhi_kashmir_byte1_7204321

मोदी सरकार आल्यापासून हिंसचाराचे प्रमाण देशात वाढले- नाना पटोले

भारतात मोदींच सरकार आल्यापासून हिंसाचाराच प्रमाण वाढलं आहे...अशा या परिस्थितीत मोबाईल बंदी करावी असा जावई शोध हा जम्मू काश्मीरचे राज्यपाल आणत असतील तर तो त्यांचा विषय असू शकतो.. आपल्यात मनुष्यधर्म तो कुठल्याही जातीचा असो त्याला त्याच स्वतंत्र कायम राहावं, अशी व्यवस्था संविधानाने दिली आहे. जम्मू काश्मिरात जी परिस्थिती निर्माण करून ठेवली ती आणि बाणी पेक्षाही वाईट असल्याची टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली.

ते वर्ध्यातील आर्वी येथे महापर्दाफाश यात्रे दरम्यान पत्रकारांच्या प्रशनाचे उत्तर देत असताना भाजप आणि शिवनेसा करत असलेल्या टिकेकर उत्तर देत दुर्दैव असल्याचे म्हणाले.

सध्या जम्मू काश्मिरात युद्ध व्यवस्थेसारखी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. राहुल गांधी तेथे गेले आणि शिवसेनेच्या वतीने टीका करण्यात आली ते पर्यटनासाठी तेथे गेले नाहीत असे उत्तर कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यानी दिले. तुम्ही माणुसकीचा धर्म सोडला आहे. काँग्रेस माणुसकीचा धर्म पाळणारा आहे, आणि म्हणून आमचे राहुल गांधी तेथे गेले आणि यावर अश्या प्रकारची टीका दुर्दैवी आहे.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.