ETV Bharat / state

Thane Crime : दोन टन प्लास्टिक पिशव्यासह टेम्पो जप्त; १० कारखान्यांवर धाड

author img

By

Published : Jan 8, 2023, 10:25 AM IST

केडीएमसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने तब्बल दोन टन प्लास्टिक पिशव्या टेम्पोसह ( Tempo seized with two tonnes of plastic ) पकडून जप्त केल्या आहेत. ( Tempo seized ) हा टेम्पो कल्याणच्या खडकपाडा भागात सापळा रचून ( Thane Crime ) पकडण्यात आला. ( plastic bags Raid on ten factories )

Tempo seized with two tonnes of plastic
दोन टन प्लास्टिक पिशव्यासह टेम्पो जप्त

दोन टन प्लास्टिक पिशव्यासह टेम्पो जप्त

ठाणे : टेम्पोमध्ये जवळजवळ ३५ गोण्या प्लास्टिकच्या पिशव्या गोणीत भरलेल्या असल्याची माहिती महापालिकेच्या भरारी पथकाला मिळाली होती. (Tempo seized ) त्यानुसार पथकाने खडकपाडा भागातून जाणाऱ्या या टेम्पोला कारवाई करत ताब्यात घेतले. ( Tempo seized with two tonnes of plastic ) सध्या या प्लास्टीकची तपासणी करून हे प्रतिबंधित प्लास्टिक आहे. ( Thane Crime ) का या संबंधी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेतली जात आहे. तर टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून त्याने इतक्या मोठ्या प्रमाणात हे प्लास्टिक कुठून आणि कोणाला विक्री करण्यासाठी आणले होते, याचा देखील शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती केडीएमसीचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली. ( plastic bags Raid on ten factories )

लाखो टन प्लास्टिकच्या पिशव्या जप्त : विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या तयार करणारे कारखाने असल्याने तत्त्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधात धडक कारवाई करत भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाच्या गोदाम परिसरातील गुरुदेव कंपाऊंड येथील प्लॅस्टिक पिशव्या बनवणाऱ्या १० कारखान्यांवर स्वतः धाड टाकत, कारखान्यांतील लाखो टन प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या होत्या. दुसरीकडे प्लास्टिक पिशव्यांना बंदी असूनही जिल्हयात अद्यापही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील विविध महापालिकेने धडाक्याने जप्तीची कारवाई सुरू केली. मात्र कारवाईचे आकडे पाहता आज ही विविध शहरात प्लास्टिक पिशवीचा वापर वाढल्याचेच दिसून येते. जिल्ह्यातील उल्हासनगर आणि भिवंडी तालुक्यात प्लास्टिक पिशव्यांची निर्मिती होत असल्याचे अनेकदा छापेमारीतून उघड झाले आहे. मात्र प्लास्टिक पिशवीवर बंदी घालून याचा कोणताच फायदा नागरिकांमध्ये झालेला दिसून येत नाही. ( Maharashtra Pollution Control Board )

लोकाना जागृत करणे महत्वाचे : आजही जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात प्लास्टिक पिशव्यांचा नागरिक वापर करताना दिसत आहे. प्लास्टिकवर बंदी घालून पर्यावरणाचा समतोल राखणे शक्य झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बंदीवर कठोर निर्णय घ्यावे लागतील व नागरिकांमध्ये मघ्ये या विषयी जन जागृती करून प्लास्टिक पासून येणाऱ्या भविष्य काळातील धोक्या विषयी लोकाना जागृत करणे फार महत्वाचे आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी असूनही सुद्धा काही कारखानदार बिनदिक्कतपणे पिशव्यांची निर्मिती करताना आपल्याला दिसून येत आहे. तर लहान मोठे दुकानदारही आपला माल, वस्तूत्याच प्रमाणे खाद्य पदार्थांची पॅकींग विशिष्ट व सर्व वातावरण सहन करण्याऱ्या सिलबंद प्लास्टीक पिशव्यात केली जात असल्याचे बाजार दिसत आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.