ETV Bharat / state

आलमट्टीतून 5 लाख क्युसेक पाणी सोडण्यास कर्नाटक तयार; पूर ओसरण्यास होणार मदत

author img

By

Published : Aug 8, 2019, 3:46 PM IST

Updated : Aug 8, 2019, 4:29 PM IST

कर्नाटकच्या आलमट्टी धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना केली. त्यानुसार त्यांनी आलमट्टी धरणातून पाच लाख क्यूसेस पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

karnataka cm agreed to release water from almatti dam it will help to low down the water level in sangli and kolhapur

मुंबई - सांगली-कोल्हापूर सध्या महापुराच्या कचाट्यात अडकले आहे. कृष्णा, वारणा आणि पंचगंगा तीनही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाण्याची पातळी कमी होत नसल्याने लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, या पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्याची विनंती केली होती. त्यावर कर्नाटक सरकारने आलमट्टीतून ५ लाख क्युसेक पाण्याच्या विसर्गाची तयारी दर्शवली आहे.

  • Maharashtra CM @Dev_Fadnavis spoke to Karnataka CM @BSYBJP and he has agreed to release 5 lakh cusecs water from Almatti dam. This will help bringing down water level in sangli.

    — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आलमट्टीतून पाणी सोडल्यास कृष्णा कोयना नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी कमी होणार आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती गंभीर आहे. सध्या या ठिकाणी एनडीआरएफ आणि स्वयंसेवी संघटनाकडून मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 8, 2019, 4:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.