ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत उपोषण - सशांक राव

author img

By

Published : Nov 30, 2021, 4:18 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी कामगारांचा प्रश्न सोडवावा म्हणून मी बेमुदत उपोषण करत असल्याचे संघर्ष युनियनचे सरचिटणीस सशांक राव यांनी म्हटले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये एसटी कामगारांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

छायाचित्र
छायाचित्र

पिंपरी-चिंचवड (पुणे) - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी कामगारांचा प्रश्न सोडवावा म्हणून मी बेमुदत उपोषण करत असल्याचे संघर्ष युनियनचे सरचिटणीस सशांक राव यांनी म्हटले आहे. ते पिंपरी-चिंचवडमधील वल्लभ नगर येथे एसटी कामगारांसोबत आंदोलन सुरू केले आहे.

राव म्हणाले की, आत्तापर्यंत 42 एसटी कामगारांच्या आत्महत्या झाल्या आहेत. कामगारांचा प्रश्न सरकारने सोडवावा, मंत्री अनिल परब हे कामगारांच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील दिसत असून कामगारांना कारवाई करण्याचा धमक्या देत आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करत आहे, असे राव म्हणाले आहेत. एसटी कामगारांचे राज्य शासनात विलिनीकरणाची मागणी अत्यंत रास्त आहे, असे ते म्हणाले आहेत. आमच म्हणणे आहे की, मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घ्यायला हवा, 1 लाख कुटुंबाचा प्रश्न आहे. प्रवाशांनाही सुविधा मिळने गरजेचे आहे, अस त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा - PMPML Bus Service : सीएनजी पंपाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पीएमपीएमएल बसेसच्या लागल्या रांगा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.