ETV Bharat / state

'भाजपच्या हिडीस आणि आक्रस्ताळेपणाला आपनं शांततेत सडेतोड उत्तर दिलं'

author img

By

Published : Feb 11, 2020, 8:31 PM IST

आपल्या विरोधात मत व्यक्त करणाऱ्याला देशद्रोही म्हणण्याचा प्रकार भाजप करत आहे. त्यांच्या या हिडीस राजकारणाचे सडेतोड उत्तर दिल्लीच्या जनतेने आम आदमी पक्षाला जिंकवून दिले, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

राजू शेट्टी
राजू शेट्टी

पुणे - विरोधी मत व्यक्त करणाऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपला आम आदमी पक्षाने लोकांचे प्रश्न सोडवून उत्तर दिले. आपचा विजय हा भाजपाच्या आक्रस्ताळ आणि हिडीस राजकारणावरचा विजय आहे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

बोलताना राजू शेट्टी

राजू शेट्टी म्हणाले, भाजपने दांभिक राष्ट्रवादाची परिसीमा गाठली होती. त्यात देशात आर्थीक मंदी, शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मानवाच्या मुलभूत गरजा पूर्ण करताना अडचणी येत आहेत. यावरुन लक्ष हटविण्यासाठी आक्रस्ताळेपणा भाजपाने सुरु केला. विरोधी मत व्यक्त करणाऱ्याला देशद्रोही ठरवण्यात आले. यावर आम आदमी पक्षाने शांतपणे नागरिकांचे प्रश्न सोडवत भाजपला चांगले उत्तर दिले. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवल्या त्याचा हा खऱ्या अर्थाने विजय आहे. नागरिकांना मुलभूत सुविधा देणारा प्रशासक मिळाला तर ते जातीधर्माच्या पलीकडे जाऊन मतदान करतात हे दिल्लीच्या मतदारांनी दाखवून दिले.

आप आणि स्वाभिमानी शेतकरी पक्ष येऊ शकतात एकत्र

आम आदमी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे नैसर्गिक मित्र आहेत. केजरीवाल यांना 2013ला मी सांगलीला घेऊन आलो होतो. आम आदमी पक्षाची ग्रामीण भागाची भूमिका स्पष्ट झाली नव्हती म्हणून आम्ही थांबलो होतो, पण, येत्या काळात दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता फेटाळता येत नाही, असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले.

हेही वाचा - 'हा तर सत्य आणि विकासाचा विजय'

Intro:

आपचा विजय हा भाजपच्या आक्रस्ताळ आणि हिडीस राजकारणावरचा विजय - राजू शेट्टी


विरोधी मत व्यक्त करणाऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपला आम आदमी पक्षाने लोकांचे प्रश्न सोडवून उत्तर दिले..आपचा विजय हा भाजपाच्या आक्रस्ताळ आणि हिडीस राजकारणावरचा विजय आहे. अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेेते राजू शेट्टी यांनी आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये ते बाेलत हाेते.


राजू शेट्टी म्हणाले, भाजपने दांभिक राष्ट्रवादाची परिसीमा गाठली हाेती. त्यात देशात मंदी, शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मानवाच्या मुलभूत गरजा पूर्ण करताना अडचणी येत आहेत. यावरुन लक्ष हटविण्यासाठी आक्रस्ताळपणा भाजपाने सुरु केला. विराेधी मत व्यक्त करणाऱ्याला देशद्राेही ठरवण्यात आले. यावर आपने शांतपणे नागरिकांचे प्रश्न साेडवले. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवल्या त्याचा हा खऱ्या अर्थाने विजय आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देणारा प्रशासक मिळाला तर ते जातीधर्माच्या पलीकडे जाऊन मतदान करतात हे दिल्लीच्या मतदारांनी दाखवून दिले.


आप आणि स्वाभिमानी शेतकरी पक्ष येऊ शकतात एकत्र

आप आणि स्वाभिमानी हे नैसर्गिक मित्र आहाेत. केजरीवाला यांना 2013 ला मी सांगली ला घेऊन आलाे हाेताे. आम आदमी पक्षाची ग्रामीण भागाची भूमिका स्पष्ट झाली नव्हती म्हणून आम्ही थांबलाे हाेताे, परंतु येत्या काळात दाेन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता फेटाळता येत नाही असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले.Body:।।Conclusion:।।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.