ETV Bharat / state

पाथरी तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेला शेतकरी; बंधाऱ्याला अडकल्याने वाचले प्राण

author img

By

Published : Sep 25, 2019, 8:43 AM IST

पूर

मुसळधार पाऊस पडल्याने पाथरी-आष्टी रस्त्यावरील नदीला पूर आला होता. या पुरामुळे खेडूला गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आले. या पाण्यातून वाट काढताना एक शेतकरी अचानक वाहून गेला. मात्र, पुढे जाऊन बंधाऱ्याला अडकल्याने त्याचे प्राण वाचले दरम्यान, हा शेतकरी पाण्यात वाहून जातानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

परभणी - रात्रभर पडलेल्या पावसामुळे सकाळी पाथरी तालुक्यातील नदीला पूर आला होता. या पुराच्या पाण्यातून वाट काढत असताना एक शेतकरी पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. मात्र, पुढे एका बंधाऱ्याला अडकून पडल्याने या शेतकऱयाचे प्राण वाचले. ज्ञानोबा बाबुराव उंडे (45) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, हा शेतकरी वाहून जातानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पुराच्या पाण्यात वाहत जाणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल


सदर घटना पाथरी तालुक्यातील खेरडा परिसरातील आहे. 23 सप्टेंबरच्या पहाटे मुसळधार पाऊस पडल्याने पाथरी-आष्टी रस्त्यावरील नदीला पूर आला होता. या पुरामुळे खेडूला गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ३ ते ४ फूट पाणी आले होते. या रस्त्यावर खेरडा गावापासून अगदी 400 मीटर अंतरावर मोठा नाला आहे.

हेही वाचा - परभणीत रोपवाटिका चालकाने फसवले; बहारात आलेली मिरची शेतकऱ्याने टाकली उपटून


23 सप्टेंबर रोजी पाथरी आणि मानवत तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसाचे पाणी खेरडा-खेडुळा नाल्याला आले, सकाळी पाण्याचा जोर वाढल्याने पुलावरून 4 फूटपर्यंत पाणी वाहत होते. खेरडा येथील काही शेतकरी पहाटे शेतातील गाय-म्हशीचे दूध काढण्यासाठी गेले होते. मात्र, परत येत असताना या नाल्याच्या पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने सगळे जण पुरात अडकून पडले. याची माहिती कळताच गावातील अनेक नागरिकांनी तिकडे धाव घेतली आणि दोरीच्या साह्याने पुरात अडकलेल्यांना गावाकडे आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, ज्ञानोबा उंडे हे दोरीच्या साह्याने पुराच्या पाण्यातून येत असताना खड्ड्यात अडकले. ज्यामुळे दोरीचा हात निसटून ते पत्रात वाहून गेले. मात्र, पुढे ३०० मीटर अंतरापर्यंत वाहून गेल्यावर नाल्यावर असणाऱ्या एका बंधाऱ्याला ते अडकल्याने सुदैवाने त्यांचा जीव वाचला.

हेही वाचा - परभणी : दिव्यांग प्राण्यांना कृत्रीम अवयव प्रत्यर्पणाचा प्रयोग यशस्वी


दरम्यान, पुराच्या पाण्यात शेतकरी वाहून जातानाचा हा व्हिडिओ सध्‍या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिल्ह्यात यावर्षी पाऊस पडत नसल्याने पुराचे प्रसंग फार क्वचितच येऊ लागले आहेत. आणि त्यातही अशी घटना घडल्याने सोशल मिडियावर हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा - जिंतूरमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री हॉटेलसह दोन घरे फोडली

Intro:परभणी - रात्रभर पडलेल्या पावसामुळे सकाळी नदीला आलेला पूर आणि त्या पुरात मागचा-पुढचा कुठलाही विचार न करता पुढे धावत जाणारा शेतकरी पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला; परंतु दैव बलवत्तर म्हणून पुढे असलेल्या एका बंधाऱ्याला अडकून या शेतकऱ्याचे प्राण वाचले. दरम्यान, हा शेतकरी वाहून जातानाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.Body:ज्ञानोबा बाबुराव उंडे (वय 45) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना पाथरी तालुक्यातील खेरडा परिसरातील आहे. 23 सप्टेंबरच्या पहाटे मुसळधार पाऊस पडल्याने पाथरी-आष्टी रस्त्यावरील नदीला पूर आला होता. या पुरामुळे खेडूला गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी आले होते. या रस्त्यावर खेरडा गावापासून अगदी 400 मीटर अंतरावर मोठा नाला आहे. या नाल्यावर पाथरी आणि मानवत तालुक्यातील पावसाचे पाणी वाहून पुढे रामपुरी मार्गे गोदावरी पात्राला मिळते. 23 सप्टेंबर रोजी पाथरी आणि मानवत तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसाचे पाणी खेरडा-खेडुळा नाल्याला आले, सकाळी पाण्याचा जोर वाढल्याने 4 फूट पुलावर पाणी आले. खेरडा येथील काही शेतकरी पहाटे शेतातील गाय-म्हशीचे दूध काढण्यासाठी गेले होते. मात्र परत येत असताना या नाल्याच्या पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने सगळे जण पुरात अडकून पडले. रस्त्यावर वरून तीन ते चार फूट पाणी वाहत असल्याने शेतकऱ्यांना गावाकडे येता येत नव्हते. पुरामध्ये काही जण अडकले असल्याची माहिती गावात समजताच गावातील अनेक नागरिक तिकडे धावले. दोरीच्या साह्याने त्यायां गावाकडे आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. तेव्हा ज्ञानोबा उंडे हे शेतकरी दोरीच्या साह्याने पुराच्या पाण्यातून येत असताना खड्ड्यात अडकले. ज्यामुळे दोरीचा हात निसटून ते पत्रात वाहून गेले. पुढे तीनशे मीटर अंतरापर्यंत वाहून गेल्यावर नाल्यावर असणाऱ्या एका बंधाऱ्याला ते अडकले. ज्यामुळे सुदैवाने त्यांचा जीव वाचला.
दरम्यान, पुराच्या पाण्यात शेतकरी वाहून जातानाचा हा व्हिडिओ भयंकर आहे. हा व्हिडिओ सध्‍या परभणी जिल्ह्यातील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जिल्ह्यात
यावर्षी पाऊस पडत नसल्याने पुराचे प्रसंग फार क्वचितच येऊ लागले आहेत, आणि त्यात अशी घटना घडल्यास त्याची जोरदार चर्चा झाल्याशिवाय राहत नाही.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- vis -pbn_farmer_flood_vis_1 to 4Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.